शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

By admin | Updated: January 19, 2015 00:59 IST

व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी

मुख्यमंत्री फडणवीस : इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्सचे उद्घाटननागपूर : व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमात ते बोलत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज, एल अ‍ॅन्ड टी म्युच्यअल फंड आणि मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, बीएसई चे एमडी आशीषकुमार चव्हाण, सीडीएसएलचे पी.एस.रेड्डी, मनी बी च्या संचालक शिवानी दाणी, एल अ‍ॅन्ड टी चे यशवंत देवस्थळी कैलास कु लकर्णी आदी उपस्थित होते.लोकांना बँका व आर्थिक क्षेत्राचे ज्ञान असल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. देशातील तरुणाईचा विकासासाठी उपयोग करावयाचा असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक कुठे व कशी करावी, गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्याची हमी आहे का, याची खात्री असायला हवी. दुप्पट-तिप्पट व्याज देणारा पैसा आणणार कोठून याचाही गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा. १९९० व्या दशकात संगणक ज्ञान महत्त्वाचे होते. आता आपण इंटरनेट वापरायला लागलो आहे. २१ वे शतक हे आर्थिक साक्षरतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ९० टक्के बँका व वित्तीय संस्था मुंंबई, ठाणे, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात आहेत. याच भागात बचत असून कर्ज वाटप केले जाते. अर्थातच उद्योगही याच भागात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात हे प्रमाण ३.५ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील १३ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. यातून ४० कोटी भारतीय बँकिंग क्षेत्राशी जोडले. लोकांचा आर्थिक क्षेत्रात सहभाग असल्याशिवाय विकास शक्य नाही या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवानी दाणी यांनी मनी बी इन्स्टिट्यूटच्या कार्याची माहिती देऊ न सुरक्षित गुंतवणुकीचे आवाहन केले. यावेळी पी.एस.रेड्डी, वाय. एम.देवस्थळी यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)१० हजार युवकांना प्रशिक्षणविदर्भातील १० हजार युवकांना बीएसईच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा आशीष कुमार चव्हाण यांनी केली. नागपुरात स्टॉक एक्सचेन्ज संदर्भात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच लघु व मध्यम उद्योगांना बीएसईकडे नोंदणी करता यावी यासाठी शिबिर आयोजित केले जातील,अशी माहिती त्यांनी दिली.प्रकल्पाला मनपाची मदतरिटेल क्षेत्रात चांगली गुंतवणूक व्हावी, या हेतूने इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहराला लाभ होणार असल्याने या उपक्रमाला महापालिकेकडून सहकार्य करण्याची ग्वाही प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.