शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

By admin | Updated: January 19, 2015 00:59 IST

व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी

मुख्यमंत्री फडणवीस : इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्सचे उद्घाटननागपूर : व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमात ते बोलत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज, एल अ‍ॅन्ड टी म्युच्यअल फंड आणि मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, बीएसई चे एमडी आशीषकुमार चव्हाण, सीडीएसएलचे पी.एस.रेड्डी, मनी बी च्या संचालक शिवानी दाणी, एल अ‍ॅन्ड टी चे यशवंत देवस्थळी कैलास कु लकर्णी आदी उपस्थित होते.लोकांना बँका व आर्थिक क्षेत्राचे ज्ञान असल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. देशातील तरुणाईचा विकासासाठी उपयोग करावयाचा असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक कुठे व कशी करावी, गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्याची हमी आहे का, याची खात्री असायला हवी. दुप्पट-तिप्पट व्याज देणारा पैसा आणणार कोठून याचाही गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा. १९९० व्या दशकात संगणक ज्ञान महत्त्वाचे होते. आता आपण इंटरनेट वापरायला लागलो आहे. २१ वे शतक हे आर्थिक साक्षरतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ९० टक्के बँका व वित्तीय संस्था मुंंबई, ठाणे, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात आहेत. याच भागात बचत असून कर्ज वाटप केले जाते. अर्थातच उद्योगही याच भागात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात हे प्रमाण ३.५ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील १३ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. यातून ४० कोटी भारतीय बँकिंग क्षेत्राशी जोडले. लोकांचा आर्थिक क्षेत्रात सहभाग असल्याशिवाय विकास शक्य नाही या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवानी दाणी यांनी मनी बी इन्स्टिट्यूटच्या कार्याची माहिती देऊ न सुरक्षित गुंतवणुकीचे आवाहन केले. यावेळी पी.एस.रेड्डी, वाय. एम.देवस्थळी यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)१० हजार युवकांना प्रशिक्षणविदर्भातील १० हजार युवकांना बीएसईच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा आशीष कुमार चव्हाण यांनी केली. नागपुरात स्टॉक एक्सचेन्ज संदर्भात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच लघु व मध्यम उद्योगांना बीएसईकडे नोंदणी करता यावी यासाठी शिबिर आयोजित केले जातील,अशी माहिती त्यांनी दिली.प्रकल्पाला मनपाची मदतरिटेल क्षेत्रात चांगली गुंतवणूक व्हावी, या हेतूने इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहराला लाभ होणार असल्याने या उपक्रमाला महापालिकेकडून सहकार्य करण्याची ग्वाही प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.