शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

आर्थिक संकटाचे राज्यावर सावट!

By admin | Updated: August 21, 2015 01:27 IST

निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात

संदीप प्रधान , मुंबई निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा राज्याच्याच वित्त खात्याने दिला आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदा मिळालेली सत्ता सोडताना युती सरकारने १९९९मध्ये महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते, याचे स्मरणही वित्त विभागाने फडणवीस सरकारला दिले आहे. टोलमाफी, एलबीटी रद्द करणे, कृषी पंपांची वीज सवलत, अन्नसुरक्षा अशा एक ना अनेक निर्णयांमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत आहे. त्याचवेळी आर्थिक मंदीमुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. बांधकाम व्यवसायात सध्या मंदी असल्याने त्याचाही परिणाम सरकारच्या उत्पन्नावर झाला आहे. अशा परिस्थितीत मागील खेपेस युती सरकार पायउतार झाल्यावर २००० ते २००४ या काळासारख्या आर्थिक संकटाला पुन्हा तोंड द्यावे लागू शकते, याकडे वित्त विभागाने लक्ष वेधले आहे. २००० ते २००४ या काळात आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात सरकारी नोकरभरती बंद केली गेली, हंगामी भरतीवरही निर्बंध घातले गेले, सरकारी खरेदीवर कठोर बंधने लादली गेली होती. त्या चार वर्षांत सरकारने खरेदी थांबवल्याने फर्निचरपासून स्टेशनरीपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा करणारे काही पुरवठादार व्यवसायातून हद्दपार झाले. तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा हा धोक्याचा इशारा आहे.जून महिन्यातील उत्पन्नाची आकडेवारी व कंसात गतवर्षी याच महिन्यातील उत्पन्न- जमीन महसूल ४६ कोटी (११७ कोटी), मुद्रांक व नोंदणी शुल्क १६३ कोटी (४४८ कोटी), राज्य उत्पादन शुल्क ९२८ कोटी (२१९२ कोटी). अशीच परिस्थिती राहिली तर उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणे वित्त विभागाला अशक्य वाटते. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने १४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये दुचाकी वाहनांना दिलेल्या टोलमाफीकरिता ८०० कोटींची तर एलबीटी रद्द करून व्यापारी वर्गाला दिलासा देण्याकरिता २०९८ कोटी रुपयांची मागणी केली होती. सबसिडीचा भार वाढला। सरकार सबसिडीपोटी ७२००ते ७५०० कोटी रुपये खर्च करते. अन्नसुरक्षा, जमीन संपादन यांसारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे राज्य सरकारवरील भार वाढल्याचे वित्त आयोगाकडे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.