शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संकटाचे राज्यावर सावट!

By admin | Updated: August 21, 2015 01:27 IST

निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात

संदीप प्रधान , मुंबई निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा राज्याच्याच वित्त खात्याने दिला आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदा मिळालेली सत्ता सोडताना युती सरकारने १९९९मध्ये महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते, याचे स्मरणही वित्त विभागाने फडणवीस सरकारला दिले आहे. टोलमाफी, एलबीटी रद्द करणे, कृषी पंपांची वीज सवलत, अन्नसुरक्षा अशा एक ना अनेक निर्णयांमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत आहे. त्याचवेळी आर्थिक मंदीमुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. बांधकाम व्यवसायात सध्या मंदी असल्याने त्याचाही परिणाम सरकारच्या उत्पन्नावर झाला आहे. अशा परिस्थितीत मागील खेपेस युती सरकार पायउतार झाल्यावर २००० ते २००४ या काळासारख्या आर्थिक संकटाला पुन्हा तोंड द्यावे लागू शकते, याकडे वित्त विभागाने लक्ष वेधले आहे. २००० ते २००४ या काळात आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात सरकारी नोकरभरती बंद केली गेली, हंगामी भरतीवरही निर्बंध घातले गेले, सरकारी खरेदीवर कठोर बंधने लादली गेली होती. त्या चार वर्षांत सरकारने खरेदी थांबवल्याने फर्निचरपासून स्टेशनरीपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा करणारे काही पुरवठादार व्यवसायातून हद्दपार झाले. तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा हा धोक्याचा इशारा आहे.जून महिन्यातील उत्पन्नाची आकडेवारी व कंसात गतवर्षी याच महिन्यातील उत्पन्न- जमीन महसूल ४६ कोटी (११७ कोटी), मुद्रांक व नोंदणी शुल्क १६३ कोटी (४४८ कोटी), राज्य उत्पादन शुल्क ९२८ कोटी (२१९२ कोटी). अशीच परिस्थिती राहिली तर उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणे वित्त विभागाला अशक्य वाटते. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने १४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये दुचाकी वाहनांना दिलेल्या टोलमाफीकरिता ८०० कोटींची तर एलबीटी रद्द करून व्यापारी वर्गाला दिलासा देण्याकरिता २०९८ कोटी रुपयांची मागणी केली होती. सबसिडीचा भार वाढला। सरकार सबसिडीपोटी ७२००ते ७५०० कोटी रुपये खर्च करते. अन्नसुरक्षा, जमीन संपादन यांसारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे राज्य सरकारवरील भार वाढल्याचे वित्त आयोगाकडे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.