शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राजकीय निर्णयांचे वित्तीय आॅडिट होणार

By admin | Updated: November 18, 2014 02:32 IST

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकीय वा इतर निर्णयांचे तसेच शिष्यवृत्ती योजनांमधील पुनरावृत्तीचे आॅडिट करा, असा सल्ला राज्य वित्त विभागाने भाजपा सरकारला दिला आहे

यदु जोशी, मुंबईआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकीय वा इतर निर्णयांचे तसेच शिष्यवृत्ती योजनांमधील पुनरावृत्तीचे आॅडिट करा, असा सल्ला राज्य वित्त विभागाने भाजपा सरकारला दिला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र शासनासमोर मांडत आर्थिक शिस्तीचा आग्रह वित्त विभागाने धरला आहे. पाच वर्षांमध्ये पोलिसांची ५५ हजार पदे भरण्याचा मोठाच गवगवा आघाडी सरकारच्या काळात करण्यात आला होता. पण एवढी पदे भरणे आवश्यक आहे काय, याचा आढावा घेऊन उर्वरित पदभरतीबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत वित्त विभागाने व्यक्त केले आहे. या पदभरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचाही आढावा घेण्याचे वित्त विभागाने सुचविले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारावर गेल्या वर्षी ७ हजार ६५८ कोटी खर्च झाला होता. यंदा हा खर्च ८ हजार ६४३ कोटींवर जाणार आहे. राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (३८० कोटी), केंद्राची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (९२३ कोटी), आर्थिक मागासवर्गीयांसाठी फी माफी (२२० कोटी) असे कोट्यवधी रुपये यंदा शिष्यवृत्तीवर खर्च केले जाणार आहेत. या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या योजनेची पुनरावृत्ती तपासून पाहावी आणि समान योजना बंद करावी, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचा संशय वित्त विभागाने एक प्रकारे व्यक्त केला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील एक लाख व त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना विमा कंपनीच्या सहभागाने सुरू केली आहे. या योजनेतील निकषांची काटेकोर तपासणी करून आढावा घेण्याचा सल्लाही वित्त विभागाने दिला आहे.राज्य जलसंधारण महामंडळाला जलसंधारण योजना राबविण्यास २०१२-१३मध्ये १५८ कोटी तर २०१३-१४मध्ये २३० कोटींचे भागभांडवली अंशदान राज्य शासनाने दिले. यंदा ४१९ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या महामंडळाच्या कामांचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे मत वित्त विभागाने दिले आहे.