शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

राजकीय निर्णयांचे वित्तीय आॅडिट होणार

By admin | Updated: November 18, 2014 02:32 IST

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकीय वा इतर निर्णयांचे तसेच शिष्यवृत्ती योजनांमधील पुनरावृत्तीचे आॅडिट करा, असा सल्ला राज्य वित्त विभागाने भाजपा सरकारला दिला आहे

यदु जोशी, मुंबईआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकीय वा इतर निर्णयांचे तसेच शिष्यवृत्ती योजनांमधील पुनरावृत्तीचे आॅडिट करा, असा सल्ला राज्य वित्त विभागाने भाजपा सरकारला दिला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र शासनासमोर मांडत आर्थिक शिस्तीचा आग्रह वित्त विभागाने धरला आहे. पाच वर्षांमध्ये पोलिसांची ५५ हजार पदे भरण्याचा मोठाच गवगवा आघाडी सरकारच्या काळात करण्यात आला होता. पण एवढी पदे भरणे आवश्यक आहे काय, याचा आढावा घेऊन उर्वरित पदभरतीबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत वित्त विभागाने व्यक्त केले आहे. या पदभरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचाही आढावा घेण्याचे वित्त विभागाने सुचविले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारावर गेल्या वर्षी ७ हजार ६५८ कोटी खर्च झाला होता. यंदा हा खर्च ८ हजार ६४३ कोटींवर जाणार आहे. राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (३८० कोटी), केंद्राची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (९२३ कोटी), आर्थिक मागासवर्गीयांसाठी फी माफी (२२० कोटी) असे कोट्यवधी रुपये यंदा शिष्यवृत्तीवर खर्च केले जाणार आहेत. या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या योजनेची पुनरावृत्ती तपासून पाहावी आणि समान योजना बंद करावी, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचा संशय वित्त विभागाने एक प्रकारे व्यक्त केला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील एक लाख व त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना विमा कंपनीच्या सहभागाने सुरू केली आहे. या योजनेतील निकषांची काटेकोर तपासणी करून आढावा घेण्याचा सल्लाही वित्त विभागाने दिला आहे.राज्य जलसंधारण महामंडळाला जलसंधारण योजना राबविण्यास २०१२-१३मध्ये १५८ कोटी तर २०१३-१४मध्ये २३० कोटींचे भागभांडवली अंशदान राज्य शासनाने दिले. यंदा ४१९ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या महामंडळाच्या कामांचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे मत वित्त विभागाने दिले आहे.