शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘सायन्स एक्स्प्रेस’ला अखेर रायगडमध्ये थांबा

By admin | Updated: July 15, 2017 05:15 IST

केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विज्ञान प्रसाराकरिता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. १६ डब्यांची ही विशेष विज्ञान ट्रेन कोकणात केवळ रत्नागिरी व मुंबई येथे थांबणार होती. परिणामी, रायगडमधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासू या सायन्स एक्स्प्रेसच्या बौद्धिक लाभास वंचित राहाणार होते. ही बाब गुरुवारी लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ई-मेल करून लक्षात आणून दिली. ही ट्रेन रायगडमध्ये एक दिवस थांबविण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’ची ही विनंती मान्य करून मंगळवारी १८ जुलै रोजी सायन्स एक्स्प्रेस रायगडवासीयांकरिता रोहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांचे कार्यालयीन सचिव सुधीर भालेराव यांनी ‘लोकमत’ला फोन करून दिली आहे.सायन्स एक्स्प्रेसचा १८ जुलै रोजीचा संपूर्ण कार्यक्रम लोकमत कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी साकेत मिश्रा यांनी कळविले आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही सायन्स एक्स्प्रेस रत्नागिरी येथे १४ ते १७ जुलै या कालावधीत थांबून थेट मुंबईत १९ ते २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे थांबणार आहे. मात्र आता यात बदल करून ती रायगडमध्ये रोहा रेल्वे स्थानकावर १८ जुलै रोजी थांबणार असल्याने रायगडवासीयांना या सायन्स एक्झिबिशनचा लाभ घेता येणार आहे. सायन्स एक्स्प्रेस पाहण्याकरिता कोणतेही शुल्क नाही. >आॅक्टोबर २००७ मध्ये सुरुवातआॅक्टोबर २००७मध्ये भारत भ्रमणास प्रारंभ केलेल्या या १६ वातानुकूलित डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत १७४६ दिवसांत १ लाख ५६ हजार कि.मी. प्रवास केला आहे. यादरम्यान देशातील ५०७ रेल्वे स्थानकांवर १ कोटी ६८ लाख विज्ञान जिज्ञासू व विद्यार्थ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक दर्शक संख्या लाभलेल्या सायन्स एक्स्प्रेसची लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये १२ वेळा नोंद झाली असल्याची माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.