शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

महाराष्ट्रातील ‘पँथर’ अखेर नरेंद्र मोदी सरकारचा राज्यमंत्री

By admin | Updated: July 6, 2016 02:13 IST

दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे.

नवी दिल्ली : दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर आठवलेंच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात आंबेडकर चळवळीतल्या रिपब्लिकन नेत्याचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मंत्रिमंडळात आठवलेंनी कॅबिनेट मंत्रिपदही भूषवले होते. रा.सु.गवई बिहार व केरळचे राज्यपाल होते. मात्र केंद्रात ते मंत्री होऊ शकले नाहीत. आर. डी. भंडारे राज्यपाल होते. विश्वनाथ प्रतापसिंगांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा सदस्यत्व दिले. काँग्रेसच्या सहकार्याने ते लोकसभेवरही निवडून आले. मात्र केंद्रात त्यांना संधी मिळाली नाही. मोदी सरकारने आठवलेंना मंत्री केल्याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र सदनात बौद्ध भिख्खू व आठवलेसमर्थकांची गर्दी होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा वेध घेत आठवले यांनी भाजपशी घरोबा केला. जातीयवादी, मनुवादी म्हणून ज्यांच्याविरोधात लढाई केली त्यांच्याच मांडवात जाऊन आठवले यांनी जाणे अनेकांना रुचले नव्हते. पण आठवलेंना वाऱ्याची दिशा कळली होती. मोदी लाटेत महायुतीचे चांगभले झाले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले. बक्षिसी म्हणून आठवलेंच्या गळ्यात खासदारकी पडली. आणि दोन वर्षात आठवले मंत्री झाले! राज्यमंत्रिपदाची शपथ घेताना आठवले इतके भावनाविवश झाले की त्यामुळे ते अडखळत होते. ते स्वत:चे नाव घ्यायलाही विसरले. राष्ट्रपतींनी त्यांना आठवण करून दिल्यानंतर मात्र आठवले सावरले. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही आठवले म्हणाले, ज्या पक्षाचे मी प्रतिनिधित्व करतो, त्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. डॉ. आंबेडकरांमुळेच हे मंत्रिपद माझ्या वाट्याला आले आहे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण मंत्रिपरिषदेत मंत्री आहोत. भाजपमध्ये माझ्या पक्षाचे कधीही विलिनीकरण होणार नाही. तसा आग्रह कोणी केला तर मी मंत्रिपदाचा राजीनामाच देईन. माझ्या विभागाचे काम मी निष्ठेने करीन. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हे माझे स्वप्न आहे. त्याचे अध्यक्षपद भूषवण्याच्या स्पर्धेत मी नाही. ‘संविधान’ सार्थकआठवले यांनी आपल्या मुंबईतील घराला ‘संविधान’ असे समर्पक नाव दिले आहे. यावर ते एकदा म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले म्हणूनच माझ्यासारख्या फाटक्या माणसाचं घर झालं! कपड्यांचा शौकरामदास आठवले यांना रंगबेरंगी कपड्यांचा भारी शौक. तेच त्यांचं फॅशन स्टेटमेन्ट बनलं आहे. माणसांनी आपल्या स्वभावासारखे कपडे घालावेत, उगीच सुटाबुटात राहून स्वत:ला जंटलमन भासवू नये. माझा स्वभाव मोकळाढाकळा आहे. त्यामुळे तसेच कपडे घालतो, असं आठवले म्हणतात.