शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

...अखेर वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

By admin | Updated: May 18, 2017 12:36 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 18 -  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला वर्सोवा पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जवळपास 4 दिवस या पुलाची दुरुस्ती सुरू होती. गेल्या रविवारपासून पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात आल्यानं मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. जुन्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याने 24 डिसेंबर 2013 पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर 2016ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पुलावरून ऑक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरू ठेवण्यात आला. एकेरी वाहतूक 20 मिनिटे सुरू ठेवली जात असल्याने सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे. 
या पुलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात, याची तपासणी केली गेली आहे. एकाच पुलावरून वाहतूक सुरू ठेवल्यामुळे रविवारपासून मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सध्या अवजड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली असून, आता ती वर्सोवा पुलावरूनही धावू शकतात. असे असले तरी सध्या हायववेर 10-10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, जुन्या पुलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 जून 2014 पासून 15 टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचे आदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी आणि स्थानिकांनी केला आहे.