शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

जलदूत एक्स्प्रेसला अखेर निरोप!

By admin | Updated: August 9, 2016 03:49 IST

लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे

मिरज : लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेने तब्बल १११ दिवस २६ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचा जगातील पहिलाच प्रसंग आहे. याची लिम्का बुकात नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले.मजुरापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे रेल्वचा पाणी पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. यापुढेही सण, उत्सव साजरे करताना, आपत्तीला तोंड देताना अशीच एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केली. ही संकल्पना मांडणारे भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य मकरंद देशपांडे म्हणाले की, मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्याने पाणीपुरवठा शक्य झाला. यामुळे मिरजेचा लौकिक वाढला आहे, असे आ. खाडे यांनी सांगितले.याप्रसंगी रेल्वे यांत्रिकी अभियंता प्रमोदकुमार, स्थानक अधीक्षक बुध्ददेव भगत, विनोद कुलकर्णी, गाडीचे चालक व्ही. एल. घटकरी, गार्ड बी. डी. सोनवणे, सहाय्यक चालक एन. व्ही. उरकुडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. सादलगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. रेल्वेचालक व्ही. एल. घटकरी यांनी समारोपाच्या फेरीचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी) १११ फेऱ्या...२६ कोटी लिटर पाणीवाघिण्यांमध्ये पाणी भरण्यासाठी मिरजेत रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत दोन किलोमिटर जलवाहिनी बसविण्यात आली. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या सहाय्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणाऱ्या जलदुत एक्स्प्रेसने १११ फेऱ्यांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचविले आहे. जून व जुलैमधील भर पावसाळ्यातही लातूरला पाणी टंचाई असल्याने ‘जलदूत’ला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात लातूर परिसरात पाऊस झाल्याने अखेर ८ आॅगस्टपासून बंद करण्याचा निर्णय झाला.