शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर मच्छीमार्केटमधील कचरा केडीएमसीनं उचलला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:56 IST

याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची केडीएमसीन त्वरित दखल घेतली असून, मच्छीमार्केटमधील कचरा  उचलला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण:कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड केडीएमसी प्रशासनानं बंद केले. मात्र  शहरात अनेक ठिकाणी कच-याचे ढीग दिसून येतात. कचरा वेळेत उचलला न गेल्यानं  मच्छीमार्केटची अवस्था बिकट झाली आहे. कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छीमार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः अळ्यांचे साम्राज्य पसरले. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची केडीएमसीन त्वरित दखल घेतली असून, मच्छीमार्केटमधील कचरा  उचलला आहे.

कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्यासंबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली होती. तसेच हा सर्व कचरा सडू लागल्यानं पांढऱ्या रंगाच्या मोठ्या अळ्याही झाल्या होत्या. याबाबत विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

कच-याच्या समस्येमुळे ग्राहकांनीही मार्केटकडे पाठ फिरवली होती. मात्र, हा कचरा आता उचलण्यात आल्याचं घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना  सांगितले. तसेच विक्रेत्यांकडून हा सर्व कचरा एकत्र करून दिला जात होता, असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे मच्छिचा कचरा वेगळा व इतर कचरा वेगळा करून देण्याबाबत विक्रेत्यांना सूचना देण्यात येणार असल्याचही ते म्हणाले. सर्व मच्छीमार्केटमध्ये अशा प्रकारच्या सूचना यागोदरच देणं आवश्यक होतं. मात्र, यापुढे अशी समस्या इतर कोणत्याही मार्केटमध्ये निर्माण होण्याच्या अगोदर केडीएमसी प्रशासनानं विक्रेत्यांशी योग्य तो संवाद साधणं गरजेच आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण