शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रोजगार सेवक पदमुक्त

By admin | Updated: April 29, 2016 00:46 IST

पवनी तालुक्यातील गटग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती प्रकाशित होताच ...

अड्याळ : पवनी तालुक्यातील गटग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती प्रकाशित होताच संबंधित विभाग अधिकारी कामाला लागले होते. विशेष म्हणजे खुद रोजगार सेवक मनोज बारसागडे यांनी आपली चुक त्यावेळीच मान्य केली होती तरीसुद्धा येथील ग्रामसेवक एस. खोब्रागडे व सरपंचा जिजा बावणे यांनी याविषयी चौकशी अधिकारी पंचायत समिती पवनी यांच्याकडे लेखी बयानात कामावर एकही रूपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. माझ्या समोर भ्रष्टाचार झाला नसल्याचे त्याच ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच यांनी दिला. रोहयोच्या कामावरील हजेरीपटात बोगस व नातेवाइकाचे नावे घालून रोजगार सेवकाने भ्रष्टाचार केल्याचे वृत्त प्रकाशित होताच वृत्ताच्या संदर्भावरून चौकशी करण्यात आली. यात रोजगार सेवक दोषी असल्याचा निर्णय चौकशी अधिकाऱ्यांनी देवून लोकमतच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात केसलापुरी, केसलवाडा, सालेभाडा या तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यात मोठ्या संख्येने रोजगार सेवक मनोज बारसागडे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात ही सभा पार पडली. परंतु येथील ग्रामसेवक एस. खोब्रागडे यांनी हा विषय प्रोसिडिंगवर न लिहता ग्रामपंचायत लेटर हेडवर लिहल्याने काही काळ तणाव होता. परंतु हा निर्णय विषय प्रोसीडिंगवर लिहला जाणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना ग्रमसेवकाने दिल्याने तणावपूर्ण वातावरण आटोक्यात आले होते. ग्रामसभेत प्रोसीडिंगचे महत्व काय व ते नसल्याने कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात, याची कल्पनाही कदाचित या ग्रामसेवकाला नसावी काय, या ग्रामसेवकाकडे कामाचा एवढा मोठा भार आहे की गेली पाच दिवसापासून प्रोसीडिंगवर हा विषय लिहायला व त्यावर सभा अध्यक्षांची स्वाक्षरी घ्यायला वेळच मिळत नाही, असे ग्रामसेवक सांगतात.प्रोसीडिंगची झेरॉक्स प्रत त्यावर काय लिहले आहे, अशी विचारणा केली असता ग्रामस्थांना व पत्रकारांना सुद्धा हे ग्रामसेवक नियमावली सांगतात, नियम कसे पाळले जातात ते येथील ग्रामसेवकांकडून ऐकायला मिळते. परंतु विशेष ग्रामसभेत प्रोसीडिंग का आणली गेली नाही, त्यावर पाच दिवस होवून सुद्धा सभा अध्यक्षाची स्वाक्षरी का झाली नाही, या रोजगार सेवक पदमुक्तीचा विषय व प्रोसीडिंगच्या झेरॉक्स प्रतची मागणी ग्रामस्थांकडून होत असतानाही ग्रामपंचायत मधून मिळत नाही, येथील वातावरण पुन्हा तापणार का याला सर्वस्वी जबाबदार येथील ग्रामसेवक की सरपंच राहणार, असा प्रकार पहिल्यांदा होत असल्याचा ग्रामस्थांचे मत आहे. (वार्ताहर)