शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अखेर सुधागड शाळेवर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 23, 2016 02:55 IST

कळंबोलीतील विद्यार्थिनीने अकरावीत प्रवेश न मिळाल्याने नैराश्येच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कळंबोली/तळोजा : कळंबोलीतील विद्यार्थिनीने अकरावीत प्रवेश न मिळाल्याने नैराश्येच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याबरोबरच, शासकीय नियमांचे उल्लंघन, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांनी सुधागड संस्थेवर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीला दहावीला ८२ टक्के गुण मिळाले आहे. मात्र कटआॅफ लिस्ट ८६ टक्क्यांना बंद झाल्याने तिला प्रवेश मिळाला नाही. व्यवस्थापकीय कोट्यातून प्रवेश देण्यासाठी पुष्पाच्या नातेवाइकांकडून सुधागड संस्थेने २० हजार रु पये आकारले होते. कायद्याने आॅफलाइन प्रवेश बेकायदेशीरपणे असताना १५ हून अधिक विद्यार्थ्यांकडून अधिक पैसे आकारल्यावर नंतर ते परत करण्यात आले. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नसल्याने पुष्पाला नैराश्य आल्याने तिने आत्महत्येचे निर्णय घेतल्याचे उघड होत आहे. शाळेने अगोदर पैसे घ्यायचे नव्हते आणि पैसे घेतले तर मुलांना प्रवेश द्यायला हवा होता. पैसे परत केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वेगळा संदेश गेला आणि त्यानेच पुष्पाचा बळी घेतल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका सरचिटणीस अशोक मोटे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष रवी पाटील, युवा मोर्चेचे अमर पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धडक देत शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. शुक्रवारी सुधागड एज्युकेशनच्या दोनही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.>विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्याकरिता शाळा व्यवस्थापनाला बोलाविण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभागाकडून या प्रकाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळण्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. - कोंडीराम पोपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली>शाळेची दुकानदारीसुधागड एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्र ारी गेल्या वर्षापासून येत आहेत. यंदा आॅफलाइन प्रवेश बंद असतानाही प्रवेशाच्या नावे शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर येत आहे.