शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

अखेर हार्बरवर धावली बारा डबा लोकल

By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST

हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली

मुंबई : हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली आणि शुक्रवारपासून (२९ एप्रिल) ही लोकल धावण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी पहिली बारा डब्यांची लोकल पहाटे सहाच्या सुमारास वाशी ते वडाळा धावली आणि चार डब्यांपासून बारा डब्यांपर्यंतचा प्रवास हार्बरने पूर्ण केला. या लोकलमुळे प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ही ३३ टक्क्यांनी वाढणार आहे.भारतातील पहिली प्रवासी रेल्वे २२ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वेचा विकास टप्प्याटप्प्याने होत गेला. मेन लाइनवर पहिली लोकल धावल्यानंतर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला अशी चार डब्यांची लोकल १९२५ साली धावली आणि त्यानंतर हार्बर रेल्वेनेही कात टाकण्यास सुरुवात केली. हार्बर मार्गावर आठ डब्यांची लोकल सुरू करण्यासही जादा काळ लागला नाही. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढत गेली. एकीकडे बरोबरीने मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील लोकलचे डबेही वाढविण्याचे काम केले जात होते. हार्बरवर नऊ डब्यांची लोकल धावण्यास १९६३ साल उजाडले. परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मेन लाइनवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आणि हार्बर रेल्वे ही दुर्लक्षितच राहिली. १९८६ साली मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर पहिली बारा डब्यांची लोकल धावल्यानंतर या मार्गावर सर्व लोकल बारा डब्यांच्या करण्यास २५ वर्र्षे लागली. यानंतर हार्बर मार्गावरही अशी लोकल त्वरित सुरू होणे अपेक्षित असतानाच त्याला लेटमार्कच लागत गेला. २00९-१0 साली हार्बरवरील बारा डब्यांसाठी लोकल प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच हे काम डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाला. हार्बरवरील बारा डब्यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम हे सीएसटी स्थानकात होते. ते काम ७२ तासांत पूर्ण केले. तरीही वडाळा येथे मोटरमनला सिग्नल पाहण्यात होत असलेला अडथळा आणि डॉकयार्ड रोड स्थानकात प्लॅटफॉर्मची बाकी असलेली लांबी व उंची यामुळे काम आणखी रखडले होते. परंतु हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देत ते मार्गी लावण्यात आले. (प्रतिनिधी)प्रवाशांना कल्पना दिलीच नाही शुक्रवारपासून बारा डब्यांच्या लोकलच्या १४ फेऱ्या झाल्या. या फेऱ्या होताना ही बारा डब्यांची लोकल असल्याची कोणतीही उद्घोषणा हार्बर स्थानकांवर होत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडत होती. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिवसभरात चौदा लोकल फेऱ्या झाल्या आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. आणखी बारा डब्यांच्या लोकल लवकरच चालविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.