शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

उष्णजल संशोधन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 23:58 IST

जूनमध्ये अहवाल : पणन विभागाची माहिती

रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा निर्यातीवरील बंदी उठविताना काही अटी ठेवल्या होत्या. निर्यातीपूर्वी आंब्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय सुचविण्यात आला होता, परंतु उष्णजल प्रक्रियेसंबंधी सुरू असलेले संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही. ते अंतिम टप्प्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली.निर्यातीपूर्वी आंबा उष्णजल प्रक्रियेमधून ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे ठेवला तर त्यावरील फळमाशी नष्ट होते. मात्र, त्यासाठी फळमाशी तयार करण्यापासूनच संशोधन हाती घेण्यात आले. हे संशोधन आता अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.हापूस आंब्याची साल पातळ असल्याने ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे आंबा ठेवल्यानंतर आंब्यावर काय परिणाम होईल, आंब्याचा दर्जा व चव टिकून राहील का, याबाबत संशोधन सुरू आहे. सध्या ४८ डिग्री सेंट्रिग्रेड तापमानात ५१ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत नऊ गटांत वर्गवारी करून संशोधन सुरू आहे. आंब्यावर होणारा परिणाम व फळमाशी नष्ट होण्याची प्रक्रिया याबाबतच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. संशोधन पूर्ण होताच याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यावर्षीचा आंबा हंगामही आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे संशोधन पुढील काळासाठीच वापरावे लागणार आहे. (प्रतिनिधी)उष्णजलऐवजी बाष्पजलउष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजून सुरूच असल्याने यावर्षी युरोपला पाठविण्यात आलेला आंबा बाष्पजल प्रक्रिया करून पाठविण्यात आला होता. अर्थात हा पर्याय म्हणून यंदा वापरला असला, तरी उष्णजल प्रक्रियेवरील काम प्राधान्याने सुरू आहे आणि ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास तीच पुढील काळात वापरली जाणार आहे.