शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

उष्णजल संशोधन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 23:58 IST

जूनमध्ये अहवाल : पणन विभागाची माहिती

रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा निर्यातीवरील बंदी उठविताना काही अटी ठेवल्या होत्या. निर्यातीपूर्वी आंब्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय सुचविण्यात आला होता, परंतु उष्णजल प्रक्रियेसंबंधी सुरू असलेले संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही. ते अंतिम टप्प्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली.निर्यातीपूर्वी आंबा उष्णजल प्रक्रियेमधून ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे ठेवला तर त्यावरील फळमाशी नष्ट होते. मात्र, त्यासाठी फळमाशी तयार करण्यापासूनच संशोधन हाती घेण्यात आले. हे संशोधन आता अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.हापूस आंब्याची साल पातळ असल्याने ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे आंबा ठेवल्यानंतर आंब्यावर काय परिणाम होईल, आंब्याचा दर्जा व चव टिकून राहील का, याबाबत संशोधन सुरू आहे. सध्या ४८ डिग्री सेंट्रिग्रेड तापमानात ५१ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत नऊ गटांत वर्गवारी करून संशोधन सुरू आहे. आंब्यावर होणारा परिणाम व फळमाशी नष्ट होण्याची प्रक्रिया याबाबतच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. संशोधन पूर्ण होताच याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यावर्षीचा आंबा हंगामही आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे संशोधन पुढील काळासाठीच वापरावे लागणार आहे. (प्रतिनिधी)उष्णजलऐवजी बाष्पजलउष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजून सुरूच असल्याने यावर्षी युरोपला पाठविण्यात आलेला आंबा बाष्पजल प्रक्रिया करून पाठविण्यात आला होता. अर्थात हा पर्याय म्हणून यंदा वापरला असला, तरी उष्णजल प्रक्रियेवरील काम प्राधान्याने सुरू आहे आणि ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास तीच पुढील काळात वापरली जाणार आहे.