शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

उष्णजल संशोधन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 23:58 IST

जूनमध्ये अहवाल : पणन विभागाची माहिती

रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा निर्यातीवरील बंदी उठविताना काही अटी ठेवल्या होत्या. निर्यातीपूर्वी आंब्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय सुचविण्यात आला होता, परंतु उष्णजल प्रक्रियेसंबंधी सुरू असलेले संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही. ते अंतिम टप्प्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली.निर्यातीपूर्वी आंबा उष्णजल प्रक्रियेमधून ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे ठेवला तर त्यावरील फळमाशी नष्ट होते. मात्र, त्यासाठी फळमाशी तयार करण्यापासूनच संशोधन हाती घेण्यात आले. हे संशोधन आता अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.हापूस आंब्याची साल पातळ असल्याने ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे आंबा ठेवल्यानंतर आंब्यावर काय परिणाम होईल, आंब्याचा दर्जा व चव टिकून राहील का, याबाबत संशोधन सुरू आहे. सध्या ४८ डिग्री सेंट्रिग्रेड तापमानात ५१ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत नऊ गटांत वर्गवारी करून संशोधन सुरू आहे. आंब्यावर होणारा परिणाम व फळमाशी नष्ट होण्याची प्रक्रिया याबाबतच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. संशोधन पूर्ण होताच याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यावर्षीचा आंबा हंगामही आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे संशोधन पुढील काळासाठीच वापरावे लागणार आहे. (प्रतिनिधी)उष्णजलऐवजी बाष्पजलउष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजून सुरूच असल्याने यावर्षी युरोपला पाठविण्यात आलेला आंबा बाष्पजल प्रक्रिया करून पाठविण्यात आला होता. अर्थात हा पर्याय म्हणून यंदा वापरला असला, तरी उष्णजल प्रक्रियेवरील काम प्राधान्याने सुरू आहे आणि ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास तीच पुढील काळात वापरली जाणार आहे.