शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

मराठवाडा पाणीवाटपाबाबत अंतिम सुनावणी २ मार्चला

By admin | Updated: January 12, 2016 03:08 IST

नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.

मुंबई : नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी नाशिक-नगरच्या रहिवाशांनी व साखर कारखारनदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तर मराठवाड्याला पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देत, या सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी ठेवण्यात येत आहे, असे सांगितले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांत आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणात किती पाणी शिल्लक आहे, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचा तसेच जोपर्यंत ही माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत नाशिक- नगरच्या धरणांतून २.४४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडू नका, असा आदेश खंडपीठाने सरकारला दिला होता.सरकारी वकिलांनी ही माहिती खंडपीठासमोर सादर केली नाही.