शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

मराठवाडा पाणीवाटपाबाबत अंतिम सुनावणी २ मार्चला

By admin | Updated: January 12, 2016 03:08 IST

नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.

मुंबई : नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी नाशिक-नगरच्या रहिवाशांनी व साखर कारखारनदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तर मराठवाड्याला पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देत, या सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी ठेवण्यात येत आहे, असे सांगितले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांत आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणात किती पाणी शिल्लक आहे, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचा तसेच जोपर्यंत ही माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत नाशिक- नगरच्या धरणांतून २.४४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडू नका, असा आदेश खंडपीठाने सरकारला दिला होता.सरकारी वकिलांनी ही माहिती खंडपीठासमोर सादर केली नाही.