शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

By admin | Updated: September 8, 2014 02:49 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली

वसंत भोसले, कोल्हापूरकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शेवटची निवडणूक लढविणार असल्याचे सांगून त्यांच्या राजकारणाला नवे वळण दिले. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ गावी ८ जानेवारी १९४४ रोजी जन्मलेल्या डॉ. कदम यांनी आपला राजकीय प्रवास एसटी महामंडळाचे संचालक म्हणून सुरू केला. १९७८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भिलवडी-वांगी हा खानापूर आणि तासगाव तालुक्यांतर्गत मतदारसंघ निर्माण करण्यात आला. त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी तेव्हापासून केली. १९८० मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसचे उमेदवार संपतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढविली आणि केवळ २३३ मतांनी ते हरले.पहिल्याच निवडणुकीपासून त्यांना बंडखोरी, संघर्ष आणि तीव्र राजकीय लढा द्यावा लागला, तो आजअखेर सुरू आहे. त्यानंतर १९८५, १९९०, १९९५, १९९७ (पोटनिवडणूक), १९९९, २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. एकूण आठ निवडणुकांपैकी दोन वेळा ते अपक्ष म्हणून लढले. उर्वरित सहा वेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंग्ांणात राहिले. या आठपैकी पोटनिवडणुकीसह तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पाच निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादीतून लढून त्यांना प्रखर विरोध केला. त्यावेळच्या प्रचारसभेत ते म्हणायचे, ‘माझे राजकीय जीवन ही दुसरी बाजू आहे. शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांतील कार्य हा माझा मुख्य आधार आहे.’ आणि ते त्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. पूर्वी सुधाकरराव नाईक, शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील सरकारमध्ये ते कायम कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिले आहेत. आगामी निवडणुकीतदेखील त्यांना पहिल्या निवडणुकीसारखाच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. अशा संघर्षपूर्ण नेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी, ‘ही माझी अखेरची निवडणूक आहे,’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणातदेखील उमटतील.