शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चित्रपट उद्योगाला दुष्काळ दिसत नाही की असंवेदनशीलतेचा कळस?

By admin | Updated: April 25, 2016 03:00 IST

भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत

लोकमत स्पेशल , अनुज अलंकार - भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत. त्याबद्दल या कलावंतांचे आभार. मात्र, यातून एक प्रश्न उपस्थित होतो की, केवळ एवढेच कलावंत पुढे का आले, उर्वरित सर्वांना काय झाले? याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणू नये, तर काय म्हणावे. मदतीसाठी कोणावर बळजबरी केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. तथापि, यात नैतिकता व संवेदनशीलतेचा प्रश्न उपस्थित होतो. एक काळ होता जेव्हा चित्रपट उद्योग राष्ट्रीय आपत्तीस मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येत होता. दुष्काळ असेल किंवा पूर, भूकंप. संकट नैसर्गिक असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल. देशाची सेवा आणि मदत करण्यात चित्रपट उद्योग कधीही मागे राहिला नव्हता. मात्र, आता दुष्काळाबाबत चित्रपट उद्योगाने काहीही देणे-घेणे नसल्याची जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच चिंतादायक आहे. चित्रपट उद्योगातील मोठमोठे दिग्गज मौन बाळगत त्या राज्यातील लोकांच्या दैन्यावस्थेचा तमाशा पाहत आहेत. ज्या राज्याने त्यांना भरभरून दिले आहे. याआधी असे संकट निर्माण झाल्यानंतर चित्रपट उद्योग एकजुटीने प्रयत्न करीत असे. कधी चॅरिटी शो करण्यात येत होते, तर कधी उदार मनाचे तारे मदत घेऊन संकटग्रस्त भागात जात होते. अभिनेत्यांनी गाव दत्तक घेतल्याची उदाहरणेही आहेत. मात्र, आता वाटते की, प्रत्येक जण अधू झाला आहे. आमच्या राज्यातील शेतकऱ्यांची किती दैना सुरू आहे याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. संकटाची ही वेळ तर निघून जाईल. येणाऱ्या मान्सूनने परिस्थिती पालटेल, अशी आशा आहे; परंतु लाखो-कोट्यवधी रुपये कमावून आलिशान जीवन जगणाऱ्या ताऱ्यांचे हे दुर्लक्ष नेहमीच आठवणीत राहील. काही ताऱ्यांमध्ये माणुसकी उरली नसल्याचे हे द्योतक असून, याला निलाजरेपणाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही.