शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

चित्रपट उद्योगाला दुष्काळ दिसत नाही की असंवेदनशीलतेचा कळस?

By admin | Updated: April 25, 2016 03:00 IST

भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत

लोकमत स्पेशल , अनुज अलंकार - भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत. त्याबद्दल या कलावंतांचे आभार. मात्र, यातून एक प्रश्न उपस्थित होतो की, केवळ एवढेच कलावंत पुढे का आले, उर्वरित सर्वांना काय झाले? याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणू नये, तर काय म्हणावे. मदतीसाठी कोणावर बळजबरी केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. तथापि, यात नैतिकता व संवेदनशीलतेचा प्रश्न उपस्थित होतो. एक काळ होता जेव्हा चित्रपट उद्योग राष्ट्रीय आपत्तीस मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येत होता. दुष्काळ असेल किंवा पूर, भूकंप. संकट नैसर्गिक असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल. देशाची सेवा आणि मदत करण्यात चित्रपट उद्योग कधीही मागे राहिला नव्हता. मात्र, आता दुष्काळाबाबत चित्रपट उद्योगाने काहीही देणे-घेणे नसल्याची जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच चिंतादायक आहे. चित्रपट उद्योगातील मोठमोठे दिग्गज मौन बाळगत त्या राज्यातील लोकांच्या दैन्यावस्थेचा तमाशा पाहत आहेत. ज्या राज्याने त्यांना भरभरून दिले आहे. याआधी असे संकट निर्माण झाल्यानंतर चित्रपट उद्योग एकजुटीने प्रयत्न करीत असे. कधी चॅरिटी शो करण्यात येत होते, तर कधी उदार मनाचे तारे मदत घेऊन संकटग्रस्त भागात जात होते. अभिनेत्यांनी गाव दत्तक घेतल्याची उदाहरणेही आहेत. मात्र, आता वाटते की, प्रत्येक जण अधू झाला आहे. आमच्या राज्यातील शेतकऱ्यांची किती दैना सुरू आहे याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. संकटाची ही वेळ तर निघून जाईल. येणाऱ्या मान्सूनने परिस्थिती पालटेल, अशी आशा आहे; परंतु लाखो-कोट्यवधी रुपये कमावून आलिशान जीवन जगणाऱ्या ताऱ्यांचे हे दुर्लक्ष नेहमीच आठवणीत राहील. काही ताऱ्यांमध्ये माणुसकी उरली नसल्याचे हे द्योतक असून, याला निलाजरेपणाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही.