शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी

By admin | Updated: September 22, 2014 00:50 IST

रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे.

मार्गात ब्रेकडाऊन : कार्यशाळा अधिकाऱ्यांचीही चालढकलयवतमाळ : रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र केवळ चालढकल सुरू असल्याने रेडिएटर नसलेल्या एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. परिणामी प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ब्रेकडाऊन ही बाब एसटी महामंडळाच्या पाचवीला पुजली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेळ, काळ, स्थळ न पाहता बंद पडते. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आडवळणाच्या गावात बंद पडलेली बस जीवाला घोर लावणारी ठरते. या सर्व बाबींची कल्पना असतानाही सुस्थितीतील बस मार्गावर पाठविण्याचे सौजन्य महामंडळाकडून दाखविले जात नाही. आता तर त्यात कळस गाठला आहे. चक्क रेडिएटर नसलेल्या बसेस सोडल्या जात आहेत. शनिवारी ८६५३ क्रमांकाची यवतमाळ-घाटंजी ही बस याच प्रकारातील आहे. यवतमाळपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाजवळ ही बस थांबली. या बसला रेडिएटरच नव्हते. गरम झाल्यामुळे थांबलेल्या बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आगारातून बस सोडताना ती रस्त्यावर धावण्यापूर्वी सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक आणि या विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु या बाबीशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या तोऱ्यात ते वागत असतात. त्यामुळे महामंडळाची जागोजागी नाचक्की होत आहे. परिणामी उत्पन्नावरही फरक पडत आहे. (वार्ताहर)पासिंग संपलेल्या बसेस रस्त्यावरवाहन कोणतेही असो, त्यासाठी आरटीओचे नियम आहे. हेच नियम एसटी महामंडळालाही लागू आहेत. मात्र महामंडळाच्या काही बसेस पासिंग संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहे. केवळ शासनाचा उपक्रम म्हणून नियमातून सवलत मिळत असल्याने महामंडळही गंभीर नाही. ५०२४ या क्रमांकाची बस पासिंग झालेले नसतानाही नांदेडसाठी सोडण्यात आली. वास्तविक बस पासिंगसाठी महिनाभरापूर्वीच नियोजन केले जाते. सदर क्रमांकाच्या बसचे शनिवारी पासिंग होणार होते. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. मात्र त्यावेळी बस बऱ्याच दूरपर्यंत पोहोचली होती. पासिंग नसलेल्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कुठलाही लाभ मिळत नाही. शिवाय चालकांवरही कारवाई केली जाते. मात्र या बाबीला जबाबदार अधिकारी कारवाई टाळली जाते.