शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी

By admin | Updated: September 22, 2014 00:50 IST

रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे.

मार्गात ब्रेकडाऊन : कार्यशाळा अधिकाऱ्यांचीही चालढकलयवतमाळ : रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र केवळ चालढकल सुरू असल्याने रेडिएटर नसलेल्या एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. परिणामी प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ब्रेकडाऊन ही बाब एसटी महामंडळाच्या पाचवीला पुजली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेळ, काळ, स्थळ न पाहता बंद पडते. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आडवळणाच्या गावात बंद पडलेली बस जीवाला घोर लावणारी ठरते. या सर्व बाबींची कल्पना असतानाही सुस्थितीतील बस मार्गावर पाठविण्याचे सौजन्य महामंडळाकडून दाखविले जात नाही. आता तर त्यात कळस गाठला आहे. चक्क रेडिएटर नसलेल्या बसेस सोडल्या जात आहेत. शनिवारी ८६५३ क्रमांकाची यवतमाळ-घाटंजी ही बस याच प्रकारातील आहे. यवतमाळपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाजवळ ही बस थांबली. या बसला रेडिएटरच नव्हते. गरम झाल्यामुळे थांबलेल्या बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आगारातून बस सोडताना ती रस्त्यावर धावण्यापूर्वी सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक आणि या विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु या बाबीशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या तोऱ्यात ते वागत असतात. त्यामुळे महामंडळाची जागोजागी नाचक्की होत आहे. परिणामी उत्पन्नावरही फरक पडत आहे. (वार्ताहर)पासिंग संपलेल्या बसेस रस्त्यावरवाहन कोणतेही असो, त्यासाठी आरटीओचे नियम आहे. हेच नियम एसटी महामंडळालाही लागू आहेत. मात्र महामंडळाच्या काही बसेस पासिंग संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहे. केवळ शासनाचा उपक्रम म्हणून नियमातून सवलत मिळत असल्याने महामंडळही गंभीर नाही. ५०२४ या क्रमांकाची बस पासिंग झालेले नसतानाही नांदेडसाठी सोडण्यात आली. वास्तविक बस पासिंगसाठी महिनाभरापूर्वीच नियोजन केले जाते. सदर क्रमांकाच्या बसचे शनिवारी पासिंग होणार होते. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. मात्र त्यावेळी बस बऱ्याच दूरपर्यंत पोहोचली होती. पासिंग नसलेल्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कुठलाही लाभ मिळत नाही. शिवाय चालकांवरही कारवाई केली जाते. मात्र या बाबीला जबाबदार अधिकारी कारवाई टाळली जाते.