शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी

By admin | Updated: September 22, 2014 00:50 IST

रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे.

मार्गात ब्रेकडाऊन : कार्यशाळा अधिकाऱ्यांचीही चालढकलयवतमाळ : रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र केवळ चालढकल सुरू असल्याने रेडिएटर नसलेल्या एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. परिणामी प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ब्रेकडाऊन ही बाब एसटी महामंडळाच्या पाचवीला पुजली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेळ, काळ, स्थळ न पाहता बंद पडते. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आडवळणाच्या गावात बंद पडलेली बस जीवाला घोर लावणारी ठरते. या सर्व बाबींची कल्पना असतानाही सुस्थितीतील बस मार्गावर पाठविण्याचे सौजन्य महामंडळाकडून दाखविले जात नाही. आता तर त्यात कळस गाठला आहे. चक्क रेडिएटर नसलेल्या बसेस सोडल्या जात आहेत. शनिवारी ८६५३ क्रमांकाची यवतमाळ-घाटंजी ही बस याच प्रकारातील आहे. यवतमाळपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाजवळ ही बस थांबली. या बसला रेडिएटरच नव्हते. गरम झाल्यामुळे थांबलेल्या बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आगारातून बस सोडताना ती रस्त्यावर धावण्यापूर्वी सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक आणि या विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु या बाबीशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या तोऱ्यात ते वागत असतात. त्यामुळे महामंडळाची जागोजागी नाचक्की होत आहे. परिणामी उत्पन्नावरही फरक पडत आहे. (वार्ताहर)पासिंग संपलेल्या बसेस रस्त्यावरवाहन कोणतेही असो, त्यासाठी आरटीओचे नियम आहे. हेच नियम एसटी महामंडळालाही लागू आहेत. मात्र महामंडळाच्या काही बसेस पासिंग संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहे. केवळ शासनाचा उपक्रम म्हणून नियमातून सवलत मिळत असल्याने महामंडळही गंभीर नाही. ५०२४ या क्रमांकाची बस पासिंग झालेले नसतानाही नांदेडसाठी सोडण्यात आली. वास्तविक बस पासिंगसाठी महिनाभरापूर्वीच नियोजन केले जाते. सदर क्रमांकाच्या बसचे शनिवारी पासिंग होणार होते. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. मात्र त्यावेळी बस बऱ्याच दूरपर्यंत पोहोचली होती. पासिंग नसलेल्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कुठलाही लाभ मिळत नाही. शिवाय चालकांवरही कारवाई केली जाते. मात्र या बाबीला जबाबदार अधिकारी कारवाई टाळली जाते.