शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बदनामीकारक लिंक्स पाठविणार्‍यांवरही गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: June 10, 2014 23:59 IST

लिंक पाठविणार्‍यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली.

ग्रामीण पोलीस अधीक्षकांची माहितीपुणे सोशल मिडीयामधून महापुरूषांविषयी बदनामीकारक प्रसारण झाल्यानंतर ते इतरांना प्रसारित करणार्‍यांवर,लिंक पाठविणार्‍यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली.तणाव निर्माण करणार्‍या घटनंाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने आज सर्वधर्मीय, सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.शांतता समितीच्या बैठकीनंतर लोहिया, जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लोहिया म्हणाले की तणावग्रस्त स्थितीत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत योग्य कारवाई केली जाणार आहे.मात्र सोशल मिडियावर जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध होतो,त्याचा सर्व्हर अमेरिकेत असतो.या मजकुराच्या लिंक वाढतात.त्यांना आवर घालणे अशक्य होते.मात्र अशा लिंक्स ज्या व्यक्ती इतरांना पाठवतील,त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.अशा गुन्ह्यांमध्ये ३वर्षे शिक्षेची तरतूद आहे.ज्यांनी दगडफेक करून सरकारी, खासगी वाहनांचे, मालमत्तांचे नुकसान केले आहे, अशांकडून भरपाई करून घ्यावी असा सूर या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राव यांनी नुकसान भरपाईची कारवाई सुरू करू, असे आश्वासन दिले.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांनी पंधरा ते पंचवीस वयोगटातील मुलांकडे मोबाईल असतात.त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जावे, अशी मागणी केली.छाजेड आणि माळवदकर यांनी जेथे हिंसक प्रकार होतील तेथे मान्यवर नेत्यांना पाचारण करून संतप्त लोकांचे मन वळवावे, असे आवाहन केले.अशा परिस्थितीत अफवा पसरविल्या जातात.मालमत्तेचे नुकसान केले जाते.छोट्या कारणांवरून प्रक्षुब्ध होऊन हिंसाचार केला जातो,असे सांगून राव यांनी असे प्रकार होऊ नयेत, असे आवाहन केले.दरम्यान, महापुरूषांची फेसबुकवर बदनामी होण्याच्या प्रकारात ग्रामीण व शहरी भागात ११२गुन्हे दाखल झाले असून ४६लाख७८हजार रूपये किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे,अशी माहिती बैठकीच्या प्रारंभी सांगण्यात आली.यापेक्षा नुकसानीची रक्कम अधिक असू शकते.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या संख्येवरून हा आकडा काढण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.२०गावांमध्ये बंद पाळण्यात आला.६ठिकाणी रस्ता रोखा आंदोलने झाली.जाळपोळ, दगडफेक,दहशतीच्या घटना झाल्या.विविध ठिकाणच्या शांतता समित्यांच्या ५२बैठका झाल्या, असे सांगण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांच्यासह विविध स्तरांमधील अधिकारी,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड,पुणे पालिकेतील शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे,भाजपचे गटनेते अशोक येनपुरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र माळवदकर, तालुका स्तरावरील शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.