शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

पालवे, संचालकांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: June 28, 2015 02:34 IST

औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़

मुंबई : औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़ यासाठी या कंपनीचे संचालक चारुदत्त पालवे यांच्यासह आठही संचालकांवर गुन्हे दाखल करा आणि नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, की याआधी विषारी रसायनमिश्रित पाणी या नाल्यात सोडल्याप्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्या वेळीदेखील आम्ही योग्य ते पुरावे प्रशासनाकडे देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. आता प्रत्यक्षात विषारी घातक रसायनाचे पाणी कोण सोडते आहे, हे सिद्ध झाले आहे. शासनानेच चौकशी करून रॅडिकोचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापेक्षा जास्तीचा पुरावा कोणता हवा आहे? या कंपनीच्या संचालकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच हे घडले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहेच, शिवाय त्या भागातील जमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. लोकांना या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारासही कंपनी आणि कंपनीचे संचालक जबाबदार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. त्यामुळे सर्व संचालकांवर कठोर कारवाई करा. कोणता संचालक कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचा आहे याचा विचार करून जर कारवाई होणार असेल तर या सरकारला स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असेही नांदगावकर म्हणाले. कसलेही दबाव आले तरीही एकाही संचालकाला पाठीशी घालू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)नांदगावकर यांनी आपल्या पत्रात मुंबईतील विषारी दारुमुळे १०० लोकांचे बळी गेल्याचाही उल्लेख केला आहे. औरंगाबादचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून रोजी प्रत्यक्ष पहाणी करुन पंचनामा केला आहे व रॅडिको कंपनीच हे पाणी सोडत असल्याचे पत्र नमूद केले आहे.