शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
3
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
4
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
5
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
6
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
7
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
8
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
9
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
10
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
11
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
12
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
13
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
14
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
15
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
16
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
17
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
18
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
19
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
20
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

पालवे, संचालकांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: June 28, 2015 02:34 IST

औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़

मुंबई : औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़ यासाठी या कंपनीचे संचालक चारुदत्त पालवे यांच्यासह आठही संचालकांवर गुन्हे दाखल करा आणि नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, की याआधी विषारी रसायनमिश्रित पाणी या नाल्यात सोडल्याप्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्या वेळीदेखील आम्ही योग्य ते पुरावे प्रशासनाकडे देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. आता प्रत्यक्षात विषारी घातक रसायनाचे पाणी कोण सोडते आहे, हे सिद्ध झाले आहे. शासनानेच चौकशी करून रॅडिकोचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापेक्षा जास्तीचा पुरावा कोणता हवा आहे? या कंपनीच्या संचालकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच हे घडले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहेच, शिवाय त्या भागातील जमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. लोकांना या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारासही कंपनी आणि कंपनीचे संचालक जबाबदार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. त्यामुळे सर्व संचालकांवर कठोर कारवाई करा. कोणता संचालक कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचा आहे याचा विचार करून जर कारवाई होणार असेल तर या सरकारला स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असेही नांदगावकर म्हणाले. कसलेही दबाव आले तरीही एकाही संचालकाला पाठीशी घालू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)नांदगावकर यांनी आपल्या पत्रात मुंबईतील विषारी दारुमुळे १०० लोकांचे बळी गेल्याचाही उल्लेख केला आहे. औरंगाबादचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून रोजी प्रत्यक्ष पहाणी करुन पंचनामा केला आहे व रॅडिको कंपनीच हे पाणी सोडत असल्याचे पत्र नमूद केले आहे.