शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

पालवे, संचालकांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: June 28, 2015 02:34 IST

औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़

मुंबई : औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़ यासाठी या कंपनीचे संचालक चारुदत्त पालवे यांच्यासह आठही संचालकांवर गुन्हे दाखल करा आणि नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, की याआधी विषारी रसायनमिश्रित पाणी या नाल्यात सोडल्याप्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्या वेळीदेखील आम्ही योग्य ते पुरावे प्रशासनाकडे देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. आता प्रत्यक्षात विषारी घातक रसायनाचे पाणी कोण सोडते आहे, हे सिद्ध झाले आहे. शासनानेच चौकशी करून रॅडिकोचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापेक्षा जास्तीचा पुरावा कोणता हवा आहे? या कंपनीच्या संचालकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच हे घडले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहेच, शिवाय त्या भागातील जमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. लोकांना या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारासही कंपनी आणि कंपनीचे संचालक जबाबदार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. त्यामुळे सर्व संचालकांवर कठोर कारवाई करा. कोणता संचालक कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचा आहे याचा विचार करून जर कारवाई होणार असेल तर या सरकारला स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असेही नांदगावकर म्हणाले. कसलेही दबाव आले तरीही एकाही संचालकाला पाठीशी घालू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)नांदगावकर यांनी आपल्या पत्रात मुंबईतील विषारी दारुमुळे १०० लोकांचे बळी गेल्याचाही उल्लेख केला आहे. औरंगाबादचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून रोजी प्रत्यक्ष पहाणी करुन पंचनामा केला आहे व रॅडिको कंपनीच हे पाणी सोडत असल्याचे पत्र नमूद केले आहे.