शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल

By admin | Updated: November 16, 2016 19:39 IST

आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १६ : आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदी झाल्यामुळे पत्राद्वारे पुर्वकल्पना देऊनही बँकेमधून पैसे न मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. नोटा बंदीवरुन पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे.

अ‍ॅड. तोसिफ शेख (वय 25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी लेखी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा तक्रार अर्ज स्विकारला. शेख यांचे स्टेट बँक आॅफ इंडीयामध्ये बचत खाते आहे. खात्यामधील त्यांची जमा, ठेव रक्कम जेव्हा ग्राहकाला लागेल तेव्हा उपलब्ध करुन देणे बँकेला बंधनकारक असल्याचा कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला आहे. शेख यांना बँकेमधून 30 हजार रुपये तातडीने काढावयाचे होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बँकेमध्ये अर्ज केला होता. त्यावेळी बँक व्यवस्थापकाने त्यांना हवी असलेली रक्कम देता येणार नाही असे सांगितले.

प्रधानमंत्री आणि गव्हर्नर यांनी मोठी रक्कम देण्यावर निर्बंध घातले आहेत. तातडीची गरज असल्याचे सांगूनही त्यांना रक्कम दिली गेली नाही. तसेच विश्वासाने ठेवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उर्जीत पटेल यांच्या आदेशाने ही रक्कम परत न देता अन्यायाने विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध भादवि कलम 406, 409, 420, 34 नुसार तक्रार देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. - लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जराही विचार न करता हा निर्णय दामटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी विश्वासाने ठेवलेली माझ्या हक्काची रक्कम मला देणे हे बँकेला कायद्याने बंधनकारक आहे. शासनाचा कोणताही अध्यादेश कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. माझी रक्कम मला न देता अपहार केल्याचा माझा आरोप आहे. पुरेसे चलन आणि नोटा उपलब्ध करुन देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे. - अ‍ॅड. तौसिफ शेख