शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराविरोधातील लढा अजून मोठा आहे!

By admin | Updated: August 29, 2015 01:42 IST

अमेरिकेतील पाचपैकी एक महिला लैंगिक अत्याचाराची पीडित आहे. त्यातील अनेक महिला गुन्हा नोंदवण्यास पुढे येत नाहीत. नोंदवलेल्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास होत नाही

मुंबई : अमेरिकेतील पाचपैकी एक महिला लैंगिक अत्याचाराची पीडित आहे. त्यातील अनेक महिला गुन्हा नोंदवण्यास पुढे येत नाहीत. नोंदवलेल्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास होत नाही, महिला अत्याचाराविरोधातील कायदा तगडा आहे; पण त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. अत्याचाराविरोधातील लढा आणखी मोठा आहे, असे मत अमेरिकन बार असोसिएशनच्या या विषयातील मुख्य समन्वयक विवियान हुएल्गो यांनी व्यक्त केले. महिला अत्याचाराविरोधातील भारतातील लढ्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी विवियान दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबईसह इतर तीन शहरांत जाऊन यासंदर्भात चर्चा केली. मुंबइतील अमेरिकन दूतावासात त्यांनी माध्यम प्रतिनिधींची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी अमेरिकेतील अत्याचाराचे विदारक चित्र मांडायलाही कमीपणा मानला नाही. त्या म्हणाल्या की, अमेरिकेत स्वस्तात वस्तू बनविण्यासाठी किंवा घरकामासाठीही मानवी तस्करी होते. देश-विदेशातून आलेल्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारे अत्याचाराला सामोरे जावे लागते. हे सारे रोखण्यासाठी पोलिसांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडावी, अशी अपेक्षा आहे. विवियान म्हणाल्या की, ‘वावा’सारखा (व्हाओलन्स अगेन्स्ट वूमन्स अ‍ॅक्ट) कायदा आहे. त्याअंतर्गत पीडितेला सोईसुविधा मिळतात. सरकारही त्यासाठी निधी उपलब्ध करून देते. पण तो पुरत नाही. कारण अत्याचार पीडितांचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यासाठी विविध सेवा देणाऱ्या सरकारी आणि सामाजिक संस्थांची मोठी साखळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून हे काम अजून मोठ्या पातळीवर नेण्याची गरज आहे.वकिलांची मोठी फौजबलात्कार किंवा अत्याचार झाल्यानंतर अनेक महिला गुन्हा नोंदवण्यास पुढे येत नसल्याची खंत व्यक्त करत विवियान म्हणाल्या की, ज्या महिला पुढे येतात त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात अमेरिकन सरकार मदतीचा हात देते. पीडितांना आर्थिक मदत दिली जाते. राहण्यासाठी शेल्टर उपबल्ध करून दिले जातात. शिवाय त्यांना चांगले वकीलही मिळतात. अमेरिकेत पीडितांना न्याय देण्यासाठी वकिलांची मोठी फौज असल्याचेही त्यांनी सांगितले.सुधारणा होत आहे!अमेरिकेत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण खूप असले तरी त्यात गेल्या २० वर्षांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. वावा कायदा आल्यापासून, हे प्रमाण कमी होत चालल्याचेही विवियान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.