शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वसईमधल्या 'त्या' पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन

By admin | Updated: June 25, 2016 20:27 IST

उद्घाटन होत नाही म्हणून वैतागून वसईकरांनीच उद्घाटन केलेल्या पंचवटी उड्डाण पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन करण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
वसई, दि. 25 - उद्घाटन होत नाही म्हणून वैतागून वसईकरांनीच उद्घाटन केलेल्या  पंचवटी उड्डाण पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन करण्यात आलं आहे. वादात सापडलेल्या या पुलाचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी पुलाचं उद्धाटन केल्यानंतर एमएमआरडीएने पुल पुन्हा बंद केला होता. पण त्यानंतर परत मनसे, जन आंदोलन समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पुलाचं वेगवेगळ्या दिवशी उद्धाटन केलं होतं. मात्र अखेर पुलाला सरकारी मुहूर्त मिळाला आणि पाचव्यांदा विष्णू सावरा आणि हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 
 
वसईच्या पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या या पूलाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथगतीने सुरु होते.२००६ ला काम सुरु झालेल्या या ७३६ मीटर लांब आणि ११ मीटर रूंदीच्या या पूलाला तब्बल ९ वर्षे लागली. आता गेल्या पंधरवड्यापासून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या पूलावरील संरक्षक कठड्याचे काम बाकी असल्यामुळे तो खुला करण्यात येत नसल्याचे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य अभियंत्यांनी दिले होते.
 
 
वसईकरांनी स्वत: उद्घाटन केलेला फ्लायओव्हर एमएमआरडीएने पुन्हा बंद केला होता. गेले कित्येक दिवस वाट पाहत असूनही पुलाचं उद्धाटन होत नसल्याने वैतागलेल्या वसईकरांनी स्वत: या पुलाचं उद्धाटन केलं होतं. मात्र सर्वसामान्यांनी पुलाचं उद्घाटन केल्याचं एमएमआरडीएला रुचलं नाही. आणि त्यांनी पुन्हा एकदा फ्लायओव्हर बंद केला होता. एमएमआरडीएच्या या भुमिकेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. 
 
चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात होती. ऐन गर्दीच्या वेळीच दररोज उद्घाटन होत असल्याने शेवटी एमएमआरडीएने पुलावर फलक लावून येत १५ दिवसात पूल वाहतूकीसाठी खुला करू अशी हमी दिली होती.
 
पाच वेळा झालं उद्घाटन
15 जून रोजी नागरिकांकडून उद्घाटन
16 जून रोजी मनसे
17 जून रोजी जनआंदोलन समिती
18 जून राष्ट्रवादी काँग्रेस
25 जून पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन
 
लिम्का बुकमध्ये नोंद होणार ?
चार वेळा उद्घाटन करून खुला झालेला वसईतील हा पूल देशातील एकमेव उदाहरण असेल. चारही वेळा वेगवेगळ्या व्यक्ती, पक्षाने उद्घाटन केल्यामुळे त्याचे वेगळेपणही ठळकपणाने जाणवणार आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या विक्रमाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डकडून नक्कीच दखल घेतली जाईल अशी उपहासात्मक चर्चा केली जात आहे.