शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पंधरा संस्थांनी लाटली १२ कोटींची शिष्यवृत्ती

By admin | Updated: September 1, 2016 06:37 IST

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/ शैक्षणिक शुल्कातील सुमारे १२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्यातील १५ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

यदु जोशी,  मुंबई सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/ शैक्षणिक शुल्कातील सुमारे १२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्यातील १५ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागाने समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत. या संस्था लातूर, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील आहेत. त्यांच्यामार्फत वाटण्यात आलेल्या शिष्यवृत्तीतील गैरव्यवहारांची चौकशी राज्य शासनाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने (टास्क फोर्स) केली होती. पथकाने या संस्थांची तपासणी केली. त्यात शिष्यवृत्ती योजनेत गैरव्यवहार झाला असून निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या संस्थांकडून ही रक्कम वसूल करावी, असेही सामाजिक न्याय विभागाच्या अवर सचिवांनी समाजकल्याण आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मान्यता नसताना अभ्यासक्रम चालविणे, नियमबाह्य शिष्यवृत्ती वाटप, बोगस प्रवेश दाखविणे, देय नसलेल्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचे वाटप आदी गैरव्यवहारांच्या अनुषंगाने शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी राज्यभरात सुरू आहे.विशेष चौकशी पथकाच्या कार्यकक्षेत केवळ चौकशी करून अहवाल देणे अपेक्षित असताना पथकाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यावरून काही महिन्यांपूर्वी वादळ उठले होते. संस्थाचालक असलेल्या विदर्भातील एका भाजपा आमदाराने संस्थांवर अशी कारवाई न करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे कारवाई थांबली होती. आताही या १५ संस्थांवरील कारवाई अशीच थांबणार का याबाबत उत्सुकता आहे.