शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

By admin | Updated: November 13, 2016 19:55 IST

कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही,  अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.
मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे आयोजित शुगरकेन परिषदेच्या उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले.  पंतप्रधान म्हणाले, "कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही. आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत स्वत: तपासला पाहिजे. कृषीविद्यापीठांमधून तसेच जास्तीत जास्त लांब उसकाडी कशी तयार होईल यासाठी संशोधन व्हायला हवे."
पंतप्रधान पुढे म्हणाले, "खाडीऐवजी झाडीच्या तेलाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी इथेनालच्या उत्पादनाकडेही लक्ष द्यायला हवे. ब्राझीलने इथेनॉला चांगला उपयोग करत आहे. भारतातही इथेनालची निर्मिती आणि वापर वाढविला पाहिजे. इथेनॉल बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत."
यावेळी नोटबंदीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळतात. नक्षलवाद, दहशतवादाची मुळे छाटण्याची आवश्यकता होती. शेती उत्पादनाला कर लागेल हा विनाकारण भ्रम पसरविला जात आहे, मात्र असे काहीही होणार नाही, असेही सांगितले.  "५०० व १००० च्या सध्याच्या नोटांचे मूल्य १४ लाख कोटी इतके आहे. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी या चलनातून बाद करणे आवश्यक होते. ७० वर्षाच्या आजारपणातून सुटका करण्यासाठी हे पाऊल गरजेचे होते. १००० च्या बदल्यात प्रत्येकाला १००० रुपयेच मिळतील, एक रुपयाही कमी देणार नाही. नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती मात्र त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. मला केवळ ३० डिसेंबर पर्यन्त ५० दिवसांची मुदत द्या, सर्व सुरळीत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.