शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

काल्पनिक विकासदर

By admin | Updated: March 19, 2017 01:37 IST

सन २०१६-१७ या वर्षाच्या राज्य अर्थव्यवस्थेचा वृद्धिंगत दर ९.४ टक्के या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७.१ तुलनेत जास्त दाखवलेला असला तरी तो वस्तुस्थितीवर आधारित

- दिलीप वळसे-पाटील सन २०१६-१७ या वर्षाच्या राज्य अर्थव्यवस्थेचा वृद्धिंगत दर ९.४ टक्के या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७.१ तुलनेत जास्त दाखवलेला असला तरी तो वस्तुस्थितीवर आधारित नसून ढोबळमानाने देण्यात आलेला आहे. वाढीव दर हा २०१७ साठी केलेल्या तरतुदीएवढा खर्च झालेला नसल्यामुळे विकासदरामध्ये ९.४ टक्के इतकी वृद्धी वाढ होऊ शकत नाही. अर्थमंत्र्यांनी ९.४ विकास दर हा काल्पनिक मांडला आहे. राज्याचे एकूण कर्ज २०१३-१४ या वर्षाअखेर २ लाख ६९ हजार ३५५ कोटी रुपये होते. या शासनाच्या काळामध्ये २०१७-१८ अखेर ४ लाख १३ हजार ४४ कोटी रुपये इतके कर्ज होईल, असा अंदाज केलेला आहे. म्हणजेच या ४ वर्षांत १ लाख ४३ हजार ६८९ कोटी एवढे प्रचंड कर्ज वाढणार आहे. २०१७ अर्थसंकल्पामध्ये विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या जुन्या शासनाच्या असून, या शासनाने नावे बदलून विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकासात भर पडण्यास औद्योगिक क्षेत्रात व रोजगार निर्मितीसाठी भरीव अशी तरतूद केलेली नाही. राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणेसाठी ज्या योजना प्रस्तावित केलेल्या आहेत त्यासाठी करण्यात आलेली तरतूद अत्यंत अल्प आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचे आश्वासन दिलेले असले तरी या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. अनुसूचित जाती, जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी करण्यात आलेली तरतूद पूर्ण खर्च होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून विभागीय स्तरावर पुनर्विनियोजन करण्याचे अधिकार वास्तववादी ठरत नाहीत. २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पीय तूट ३ हजार ६४५ कोटी रुपये दर्शविण्यात आलेली होती; परंतु प्रत्यक्षात ती सुधारित अंदाजामध्ये १४ हजार ३७८ कोटी रुपये इतकी दर्शविण्यात आलेली आहे. म्हणजे अर्थसंकल्पातील महसुली तूट ही वस्तुस्थितीवर आधारित नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेता सन २०१७-१८ मध्ये महसुली तूट ४ हजार ५११ कोटी रुपये दर्शविण्यात आलेली आहे. त्यामध्येसुद्धा निश्चितच वाढ होणार आहे, म्हणून अर्थसंकल्पीय तरतुदी या वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे, हे अर्थसंकल्पामधून दिसत नाही. २०१६-१७ ची राजकोषीय तूट ३५ हजार ३१ कोटी रुपये प्रस्तावित होती. ती सुधारित अंदाजात ५० हजार ३१८ कोटी रुपये झालेली आहे. याच गणनेवर विचार करता, २०१७-१८ मध्ये राजकोषीय तूट ३८ हजार ७८९ कोटी रुपये जरी अपेक्षित धरलेली असली तरी ती वास्तववादी वाटत नसून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यावरून राज्याची आर्थिक स्थिती बिघाडलेली आहे, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठी गतवर्षी करण्यात आलेल्या तरतुदींपैकी अद्याप काहीही खर्च केलेला नाही.