शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

उत्सवांना ‘हद्द’ घालावीच लागेल

By admin | Updated: July 10, 2015 04:26 IST

रस्त्यांवर साजऱ्या केल्या जाणाऱ्या धार्मिक उत्सवांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या उत्सवांवर मंडपांचे आकार आणि आवाजाची तीव्रता याबाबतीत बंधने घालावीच लागतील

मुंबई : रस्त्यांवर साजऱ्या केल्या जाणाऱ्या धार्मिक उत्सवांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या उत्सवांवर मंडपांचे आकार आणि आवाजाची तीव्रता याबाबतीत बंधने घालावीच लागतील, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले व यासंबंधीचे धोरण ठरविण्यासाठी एक आठवड्याची शेवटची मुदत दिली.ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आहे. यावर न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये सरकारला उत्सवांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी काय करणार हे ठरवायला सांगितले होते. यानंतर तीन महिने झाले तरी कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्याने न्या. अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सरकारला चांगलेच फटकारले.आम्ही कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या उत्सवांवर निर्बंध घालण्यासाठी आदेश दिलेले नाहीत. हे आदेश सर्व धर्मांच्या उत्सवांसाठी आहेत असे स्पष्ट करून खंडपीठाने सांगितले की, आमचे आदेश पटले नसतील तर त्याला खुशाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्या; पण आदेशांची अंमलबजावणी करायला उशीर करू नका. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास यासाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस धाडली जाईल, असेही न्यायमूर्तींनी बजावले. मार्चमध्ये दिलेल्या आदेशानुसार मुख्य सचिव (अतिरिक्त भार) डॉ. पी. एस. मेनन, गृह प्रधान सचिव (विशेष) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नगर विकास सचिव मनीषा म्हैसकर, पर्यावरण प्रधान सचिव विशाल नायर सिंग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली.त्यांपैकी प्रदूषण मंडळाने गेल्या काही वर्षांत आवाजाचे नियम धाब्यावर बसवले गेले असल्याने शासनाने याला निर्बंध घालण्यासाठी अधिक दक्षता घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले. त्यावर या मुद्दयाचा शासन गांभीर्याने विचार करावा व त्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.मात्र इतर सचिवांच्या प्रतिज्ञापत्रांवर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुळात एखाद्या नागरिकाला आवाजाची तक्रार करायची असल्यास तो ही तक्रार कोठे करू शकतो व या तक्रारीनुसार कोणत्या अधिकाऱ्याला कारवाईचे अधिकार असणार आहेत हे कोणाच्याही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे संबंधित सचिवांना न्यायालयाचे आदेश समजले नाहीत अथवा त्यांचा गैरसमज झाला आहे, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.मार्चमधील आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जूनमध्ये बैठक घेण्यात आली. याचा अर्थ शासनाला न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य नाही, असेही न्यायालयाचे मत पडले.या संदिग्ध प्रतिज्ञापत्रांबद्दल हंगामी अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी या प्रतिज्ञापत्राबाबत दिलगिरी व्यक्त केली व संबंधित सचिवांची नव्याने बैठक घेऊन नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे सांगितले. त्यासाठी एक आठवड्याचा वेळ देऊन सुनावणी तहकूब केली गेली.-----------आमचे आदेश पटले नसतील तर त्याला खुशाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्या. पण आदेशांची अंमलबजावणी करायला उशीर करू नका. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास यासाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस धाडली जाईल, असेही न्यायमूर्तींनी बजावले. - हायकोर्ट-----------च्न्यायालयाने निर्बंध घातले तरी गणेशोत्सव निर्विघ्न साजरा होईल व आवश्यक वाटल्यास यासाठी कायद्यात बदल करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खरी; पण भाजपाने न्यायालयात घेतलेल्या भूमिकेने उत्सव मंडळांची कोंडी होणार आहे. च्शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उत्सव मंडळाचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडले होते. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही ग्वाही दिली होती. च्गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव यांना सांगितले होते. पण आता कायद्याच्या चौकटीत राहून भाजपा रस्त्यांवर मंडप उभारणाऱ्या आयोजकांची बाजू न्यायालयात कशी मांडणार? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. --------------ठाण्यात रस्त्यावर मंडपांना परवानगीमुंबई : रस्त्याच्या एकचतुर्थांश भागावर मंडपाला परवानगी देणारे धोरण आखल्याची माहिती ठाणे महापालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. रस्त्यावरच्या मंडपांचा तिढा सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, अन्य महापालिका याचे अनुकरण करणार की रस्त्यांवर मंडपांना परवानगी नाकारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकतृतीयांश रस्ता मंडपांना दिल्याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पालिकेने न्यायालयात सादर केले होते. मात्र यात बदल करून एकचतुर्थांश रस्ता मंडपांना देणार असल्याचे पालिकेचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे यांनी न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाला सांगितले.