शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रंगोत्सवात यंदाही साजरी झाली कोरडी धुळवड

By admin | Updated: March 14, 2017 02:02 IST

पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा

टीम लोकमत , ठाणेपाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या आणि विशेषत: नैसर्गिक रंगाचा वापर करत कोरडी धुळवड साजरी करण्यात आली. रविवारी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून ४,६८६ होळ्यांचे दहन करण्यात आले. इतर सण-उत्सवांप्रमाणेच होळी आणि धुलिवंदनाचा सण ठाणे जिल्ह्यात सामाजिक भान राखत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.गेली काही वर्षे पाण्याचे असलेले दुर्भिक्ष्य लक्षात घेता धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात असे. तुलनेने यंदा पाणीटंचाईला नुकतीच सुरूवात झालेली असली, तरी पुढील काळात ती वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे भान राखत ठाणेकरांनी पाण्याचा कमीत कमी वापर केला. काही मोजक्या वस्त्या वगळता पाण्याचा, फुग्यांचा वापर कमी झाला. लहान मुले वगळता पिचकाऱ्यांच्या वापरावरही मर्यादा आल्याचे दिसून आले. काही सामाजिक संस्थांबरोबर सोसायट्यांनीही पाणी वापराच्या निर्बंधाबाबत आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धूळवडही दुपारपर्यंत साजरी न करता ठराविक मर्यादित वेळेतच साजरी झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरूणाई थिरकली, तर काही संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगलेल्या होळीवर आधारित नृत्ये, लावण्यांचा युवा वर्गाने आनंद लुटला. कोरडी धुळवड खेळल्यानंतर आपल्या ग्रुपचा सेल्फी मोबाईलमध्ये टिपण्यात अनेक जण दंग होते. शहरात नाक्यानाक्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासूनच सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होती. बस आणि धुळवड खेळलेले बाईकस्वार याशिवाय कोणाची वर्दळ नव्हती. अनेकांनी दुपारनंतर आपापल्या ग्रुपसोबत बाहेर पडून टपरी, धाब्यांवर जेवण, नाश्ताचा आनंद लुटला. काही सोसायट्यांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळ यांसह काही ठिकाणी रविवारी रात्री पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. ब्रह्मांड सोसायटी तसेच पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने टाकाऊ वस्तूंची होळी करण्यात आली.