शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रंगोत्सवात यंदाही साजरी झाली कोरडी धुळवड

By admin | Updated: March 14, 2017 02:02 IST

पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा

टीम लोकमत , ठाणेपाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या आणि विशेषत: नैसर्गिक रंगाचा वापर करत कोरडी धुळवड साजरी करण्यात आली. रविवारी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून ४,६८६ होळ्यांचे दहन करण्यात आले. इतर सण-उत्सवांप्रमाणेच होळी आणि धुलिवंदनाचा सण ठाणे जिल्ह्यात सामाजिक भान राखत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.गेली काही वर्षे पाण्याचे असलेले दुर्भिक्ष्य लक्षात घेता धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात असे. तुलनेने यंदा पाणीटंचाईला नुकतीच सुरूवात झालेली असली, तरी पुढील काळात ती वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे भान राखत ठाणेकरांनी पाण्याचा कमीत कमी वापर केला. काही मोजक्या वस्त्या वगळता पाण्याचा, फुग्यांचा वापर कमी झाला. लहान मुले वगळता पिचकाऱ्यांच्या वापरावरही मर्यादा आल्याचे दिसून आले. काही सामाजिक संस्थांबरोबर सोसायट्यांनीही पाणी वापराच्या निर्बंधाबाबत आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धूळवडही दुपारपर्यंत साजरी न करता ठराविक मर्यादित वेळेतच साजरी झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरूणाई थिरकली, तर काही संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगलेल्या होळीवर आधारित नृत्ये, लावण्यांचा युवा वर्गाने आनंद लुटला. कोरडी धुळवड खेळल्यानंतर आपल्या ग्रुपचा सेल्फी मोबाईलमध्ये टिपण्यात अनेक जण दंग होते. शहरात नाक्यानाक्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासूनच सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होती. बस आणि धुळवड खेळलेले बाईकस्वार याशिवाय कोणाची वर्दळ नव्हती. अनेकांनी दुपारनंतर आपापल्या ग्रुपसोबत बाहेर पडून टपरी, धाब्यांवर जेवण, नाश्ताचा आनंद लुटला. काही सोसायट्यांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळ यांसह काही ठिकाणी रविवारी रात्री पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. ब्रह्मांड सोसायटी तसेच पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने टाकाऊ वस्तूंची होळी करण्यात आली.