शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

रंगोत्सवात यंदाही साजरी झाली कोरडी धुळवड

By admin | Updated: March 14, 2017 02:02 IST

पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा

टीम लोकमत , ठाणेपाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या आणि विशेषत: नैसर्गिक रंगाचा वापर करत कोरडी धुळवड साजरी करण्यात आली. रविवारी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून ४,६८६ होळ्यांचे दहन करण्यात आले. इतर सण-उत्सवांप्रमाणेच होळी आणि धुलिवंदनाचा सण ठाणे जिल्ह्यात सामाजिक भान राखत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.गेली काही वर्षे पाण्याचे असलेले दुर्भिक्ष्य लक्षात घेता धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात असे. तुलनेने यंदा पाणीटंचाईला नुकतीच सुरूवात झालेली असली, तरी पुढील काळात ती वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे भान राखत ठाणेकरांनी पाण्याचा कमीत कमी वापर केला. काही मोजक्या वस्त्या वगळता पाण्याचा, फुग्यांचा वापर कमी झाला. लहान मुले वगळता पिचकाऱ्यांच्या वापरावरही मर्यादा आल्याचे दिसून आले. काही सामाजिक संस्थांबरोबर सोसायट्यांनीही पाणी वापराच्या निर्बंधाबाबत आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धूळवडही दुपारपर्यंत साजरी न करता ठराविक मर्यादित वेळेतच साजरी झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरूणाई थिरकली, तर काही संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगलेल्या होळीवर आधारित नृत्ये, लावण्यांचा युवा वर्गाने आनंद लुटला. कोरडी धुळवड खेळल्यानंतर आपल्या ग्रुपचा सेल्फी मोबाईलमध्ये टिपण्यात अनेक जण दंग होते. शहरात नाक्यानाक्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासूनच सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होती. बस आणि धुळवड खेळलेले बाईकस्वार याशिवाय कोणाची वर्दळ नव्हती. अनेकांनी दुपारनंतर आपापल्या ग्रुपसोबत बाहेर पडून टपरी, धाब्यांवर जेवण, नाश्ताचा आनंद लुटला. काही सोसायट्यांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळ यांसह काही ठिकाणी रविवारी रात्री पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. ब्रह्मांड सोसायटी तसेच पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने टाकाऊ वस्तूंची होळी करण्यात आली.