शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही ‘सुकमा’ची भीती

By admin | Updated: April 26, 2017 01:37 IST

माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नरेश डोंगरे / नागपूरमाओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकार नक्षलींना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. नक्षल्यांनी गेल्या दीड महिन्यात जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या आहेत. ४ महिन्यांत ५ निरपराध नागरिकांची हत्या केली असून, कोणत्याही क्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडू शकते. मात्र, सरकारी पातळीवर याचे गांभीर्य दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी अभियान प्रमुखांसह(एएनओ) अनेक पदे तब्बल अडीच महिन्यांपासून रिक्त आहेत. शिवाय, नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या एएनओवर आहे, तिथेही दोन डझनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यात चार पोलीस निरीक्षक आणि डझनभर उपनिरीक्षकांचाही समावेश आहे. एएनओ प्रमुखांचे पदही रिक्त आहे. २०१६ मध्ये या पदावर शिवाजीराव बोडखे हे कार्यरत होते. डिसेंबर २०१६ अखेरीस गृहविभागाने या पदावर एस. शेलार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तशी रीतसर बदली प्रक्रिया झाली. मात्र, शेलार यांनी या बदली आदेशाला धुडकावून लावले. तब्बल महिनाभर वाट बघूनही ते येथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे बोडखे यांनी ४ फेब्रुवारीला त्यांच्या नव्या जबाबदारीचा पदभार स्वीकारला.