शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात 'देवनार'ची भीती

By admin | Updated: August 4, 2016 17:26 IST

नायगाव परिसरातील 'डम्पिंग ग्राउंड'वर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली

- आशीष गावंडे

 अकोला, दि. ४ : नायगाव परिसरातील 'डम्पिंग ग्राउंड'वर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा निघत नसेल तर मुंबईत ज्याप्रमाणे देवनार येथे डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याची घटना घडली असाच प्रकार नायगावमध्ये होण्याची शक्यता आहे नायगावस्थित 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर अतिक्रमकांनी केलेला कब्जा व कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी आता कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमकांकडून धमक्या व शिवीगाळ केली जात असल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी शहराच्या इतर भागात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने पुढाकार घेण्याची गरज असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील मनपाच्या मालकीच्या सुमारे १० एकर जागेवर शहरातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची साठवणूक केली जाते. मागील काही वर्षांपासून या भागात लोकसंख्येची वाढ झाली, शिवाय अतिक्रमकांनी मोठ्या प्रमाणात 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर कब्जा केल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर कचरा टाकल्या जातो, नेमक्या त्याच जागेवर अतिक्रमकांनी घरे उभारली आहेत.

अतिक्रमकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची साठवणूक करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध अडथळ्यांच्या सामना करावा लागत आहे. यात भरीस भर कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. परिणामी, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने ठोस प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कचरा साठवणुकीसाठी 'डम्पिंग ग्राउंड'वर जागा शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे कचरा जमा करणारे वाहनचालक शहराच्या इतर भागात कचरा टाकून मोकळे होत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पावसाच्या दिवसांत साथ रोगांचा फैलाव होण्यास मदत होत आहे.