शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

अकोल्यात 'देवनार'ची भीती

By admin | Updated: August 4, 2016 17:26 IST

नायगाव परिसरातील 'डम्पिंग ग्राउंड'वर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली

- आशीष गावंडे

 अकोला, दि. ४ : नायगाव परिसरातील 'डम्पिंग ग्राउंड'वर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा निघत नसेल तर मुंबईत ज्याप्रमाणे देवनार येथे डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याची घटना घडली असाच प्रकार नायगावमध्ये होण्याची शक्यता आहे नायगावस्थित 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर अतिक्रमकांनी केलेला कब्जा व कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी आता कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमकांकडून धमक्या व शिवीगाळ केली जात असल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी शहराच्या इतर भागात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने पुढाकार घेण्याची गरज असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील मनपाच्या मालकीच्या सुमारे १० एकर जागेवर शहरातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची साठवणूक केली जाते. मागील काही वर्षांपासून या भागात लोकसंख्येची वाढ झाली, शिवाय अतिक्रमकांनी मोठ्या प्रमाणात 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर कब्जा केल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर कचरा टाकल्या जातो, नेमक्या त्याच जागेवर अतिक्रमकांनी घरे उभारली आहेत.

अतिक्रमकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची साठवणूक करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध अडथळ्यांच्या सामना करावा लागत आहे. यात भरीस भर कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. परिणामी, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने ठोस प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कचरा साठवणुकीसाठी 'डम्पिंग ग्राउंड'वर जागा शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे कचरा जमा करणारे वाहनचालक शहराच्या इतर भागात कचरा टाकून मोकळे होत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पावसाच्या दिवसांत साथ रोगांचा फैलाव होण्यास मदत होत आहे.