शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकामुळेच अपघाताची भीती

By admin | Updated: June 9, 2016 02:12 IST

सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत.

देहूगाव : तळेगाव-चाकण रस्त्यावरील सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत. त्यामुळे वेग कमी केला न गेल्याने वाहने गतिरोधकावरून उंच उडतात. त्यामुळे चालकांचा वाहनांवरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने हे गतिरोधक अत्यंत धोकादायक बनले आहेत. अपघात टाळण्यासाठी टाकण्यात आलेले गतिरोधक हेच अपघातास कारणीभूत होऊ शकतात. अशा गतिरोधकांवर तातडीने परावर्तक बसवावेत, अथवा पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी येथील उपसरपंच बाळासाहेब गाडे यांनी केली आहे. सुधा नदीवर तळेगाव व चाकणकडून एकेरी वाहतूक करणारे दोन स्वतंत्र पूल आहेत. यापैकी एक स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यालाच लागून नवा पूल अलीकडेच बांधण्यात आला आहे. हे पूल खोलगट व वळणावर असल्याने तळेगाव व चाकणच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना हा पूल लवकर दिसत नाही. दोन्ही बाजूला तीव्र उतारही आहेत. त्यामुळे चालकांना पुला व वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी पुलाच्या सुरुवातीलाच वाहनांची गती कमी करण्यासाठी व तळेगाव व चाकणच्या मार्गावर मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. ते उंच व मोठे तर आहेत. त्यावर कोणताही परावर्तक किंवा पांढरे पट्टे लावलेले नसल्याने वाहनचालकांना हे गतिरोधक रात्रीच नाही, तर दिवसाही लवकर दिसत नाहीत. (वार्ताहर) >गतिरोधक दिसत नसल्याने वाहनांचा वेग कमी होत नाही किंवा वाहनचालकांना वाहनांचा गतिरोधक दिसल्यानंतर वेग कमी करण्यास संधी मिळत नाही. वाहने वेगात असल्याने गतिरोधकावर वाहने उंच उडतात. वाहने उंच उडाल्याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीच्या पात्रात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.