शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

निकृष्ट रस्त्याविरोधात उपोषण सुरू

By admin | Updated: July 13, 2017 03:38 IST

स्वाभिमान संघटनेने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कुडूस नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : स्वाभिमान संघटनेने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कुडूस नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी घोषणाबाजी केली. त्याचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील करीत आहेत. भिवंडी-वाडा-मनोर रस्ता सुस्थितीत करावा, कुडूस-चिंचघर-देवघर रस्त्याची दुरूस्ती करावी, कुडूस नाक्यावरील गटारे व डिव्हायडरची कामे पूर्ण करा तसेच कोंढले खैरे हा रस्ता नुतनीकरण मे महिन्यात झाले तरी तो पहिल्याच पावसात उखडला गेला. यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, प्रवक्ते प्रमोद पवार, काँग्रेसचे नेते इरफान सुसे, रामदास जाधव, डॉ. गिरीश चौधरी, देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजी मोरे, नारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर पाटील आदींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. वाडा तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे, शुभम जाधव, महेंद्र जाधव, संदीप दुबेले हे उपोषणाला बसले आहेत.