शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंविरोधात बोलण्याची फॅशन

By admin | Updated: March 13, 2016 04:53 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले

औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले. साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन विशेष पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार माधवराव गोडबोले यांना त्यांच्या ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व : एक सिंहावलोकन’ या ग्रंथासाठी, तर रंगभूमीच्या लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार लातूरचे श्रीराम गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.मी काही इंदिरा गांधी, नेहरू अथवा काँग्रेसचा भक्त नाही; परंतु ज्यांनी नेहरू वाचले नाही, समजून घेतले नाही, अशा व्यक्ती दिमाखात त्यांच्या विरोधात बोलतात. जणू नेहरू यांच्या कार्याविषयी बोलण्याची फॅशनच आली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीविषयी बोलताना अभ्यासपूर्ण बोलायला हवे, असे सांगून गोडबोले म्हणाले, आज हिंदूराष्ट्र संकल्पनेवर बोलले जाते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहरू नसते तर सर्वधर्म समभावच देशात दिसला नसता. आज जी काही विविध विषयांवर मतप्रदर्शने होत आहेत, ती अभ्यासपूर्ण नाहीत.आपण साडेतीन वर्षांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतही काम केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेले ते सर्वाेत्तम गृहमंत्री होते, असेही ते म्हणाले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)