शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नेहरूंविरोधात बोलण्याची फॅशन

By admin | Updated: March 13, 2016 04:53 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले

औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले. साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन विशेष पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार माधवराव गोडबोले यांना त्यांच्या ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व : एक सिंहावलोकन’ या ग्रंथासाठी, तर रंगभूमीच्या लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार लातूरचे श्रीराम गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.मी काही इंदिरा गांधी, नेहरू अथवा काँग्रेसचा भक्त नाही; परंतु ज्यांनी नेहरू वाचले नाही, समजून घेतले नाही, अशा व्यक्ती दिमाखात त्यांच्या विरोधात बोलतात. जणू नेहरू यांच्या कार्याविषयी बोलण्याची फॅशनच आली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीविषयी बोलताना अभ्यासपूर्ण बोलायला हवे, असे सांगून गोडबोले म्हणाले, आज हिंदूराष्ट्र संकल्पनेवर बोलले जाते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहरू नसते तर सर्वधर्म समभावच देशात दिसला नसता. आज जी काही विविध विषयांवर मतप्रदर्शने होत आहेत, ती अभ्यासपूर्ण नाहीत.आपण साडेतीन वर्षांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतही काम केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेले ते सर्वाेत्तम गृहमंत्री होते, असेही ते म्हणाले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)