शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नेहरूंविरोधात बोलण्याची फॅशन

By admin | Updated: March 13, 2016 04:53 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले

औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले. साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन विशेष पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार माधवराव गोडबोले यांना त्यांच्या ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व : एक सिंहावलोकन’ या ग्रंथासाठी, तर रंगभूमीच्या लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार लातूरचे श्रीराम गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.मी काही इंदिरा गांधी, नेहरू अथवा काँग्रेसचा भक्त नाही; परंतु ज्यांनी नेहरू वाचले नाही, समजून घेतले नाही, अशा व्यक्ती दिमाखात त्यांच्या विरोधात बोलतात. जणू नेहरू यांच्या कार्याविषयी बोलण्याची फॅशनच आली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीविषयी बोलताना अभ्यासपूर्ण बोलायला हवे, असे सांगून गोडबोले म्हणाले, आज हिंदूराष्ट्र संकल्पनेवर बोलले जाते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहरू नसते तर सर्वधर्म समभावच देशात दिसला नसता. आज जी काही विविध विषयांवर मतप्रदर्शने होत आहेत, ती अभ्यासपूर्ण नाहीत.आपण साडेतीन वर्षांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतही काम केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेले ते सर्वाेत्तम गृहमंत्री होते, असेही ते म्हणाले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)