शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फोफावतोय वैचारिक दहशतवाद

By admin | Updated: May 30, 2017 03:20 IST

आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर

पुणे : आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर चर्चा घडतात आणि वाट चुकलेले विचारवंत सैन्याच्या विरोधात बोलतात. भारतात सध्या वैचारिक दहशतवाद फोफावला आहे. देशद्रोही लोकांपासून देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर रायगड या पायी पालखी सोहळ्यानिमित्त लालमहाल येथे शिवधनुष्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी महाजन बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक व दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, छायाचित्रकार सुरेश तरलगट्टी, संदीप भोंडवे यांना क्रीडा पुरस्कार, शीतल कापशीकर यांना शाहिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, सरदार कृष्णाजी नाईक बांदल यांचे वंशज करणराजे बांदल, पिलाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, शिवशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे व शाहीर हिंगे कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे,ऐतिहासिक गीते सादर केली.महाजन म्हणाले, ‘भारतात चीन आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले होत आहेत. चीनने भारतावर आर्थिक घुसखोरी आणि आक्रमणही केले आहे. अशा वेळी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देऊन चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. आपले घर, परिसर सुरक्षित असेल तर देशही सुरक्षित राहू शकतो. देशाच्या सुरक्षेला घातक ई-मेल, एसएमएस येत असल्यास सायबर पोलिसांना तत्काळ माहिती देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कान आणि डोळे उघडे ठेवून वावरणे गरजेचे आहे.’युद्धाचा अपारंपरिक मार्गकाश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले. ‘लढाईला कोणतेही नियम नसतात. काश्मीरमध्ये जे युद्ध लढले जात आहे ते अत्यंत अपारंपरिक आहे. भारतीय सैन्याला अपारंपरिक मार्गच चोखाळावा लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी हेच केले होते. आपली ताकद शत्रूपेक्षा कमी असते तेव्हा शत्रूला बेसावध पकडून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय. आजचे विचारवंत तेव्हा असते, तर शाहिस्तेखानावर वार करण्याबद्दल त्यांनी छत्रपतींनाही प्रश्न विचारले असते, असे ते म्हणाले. जे राजकीय पक्ष सैनिकांच्या विरोधात बोलतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे लोकांनी सांगायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शिवरायांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा ठसा जनतेवर उमटला आहे. हे श्रद्धास्थान जगाला परिचित होणे आवश्यक आहे. शिवरायांची वीरता, शौर्य, आस्था काही अंशी आपल्यामध्ये रुजली तरच आपण स्वत:ला त्यांचे पाईक म्हणवून घेऊ.- मुक्ता टिळक, महापौर देशाला सशक्त करण्यात महाराष्ट्राची, मराठी माणसाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. समाजात तरुणांना विधायक कामांसाठी प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे. सशक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विज्ञाननिष्ठ आणि समृद्ध भारत हे आपले स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांचा मूलमंत्र उपयुक्त ठरणार आहे.- पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञ