शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फोफावतोय वैचारिक दहशतवाद

By admin | Updated: May 30, 2017 03:20 IST

आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर

पुणे : आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर चर्चा घडतात आणि वाट चुकलेले विचारवंत सैन्याच्या विरोधात बोलतात. भारतात सध्या वैचारिक दहशतवाद फोफावला आहे. देशद्रोही लोकांपासून देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर रायगड या पायी पालखी सोहळ्यानिमित्त लालमहाल येथे शिवधनुष्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी महाजन बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक व दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, छायाचित्रकार सुरेश तरलगट्टी, संदीप भोंडवे यांना क्रीडा पुरस्कार, शीतल कापशीकर यांना शाहिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, सरदार कृष्णाजी नाईक बांदल यांचे वंशज करणराजे बांदल, पिलाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, शिवशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे व शाहीर हिंगे कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे,ऐतिहासिक गीते सादर केली.महाजन म्हणाले, ‘भारतात चीन आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले होत आहेत. चीनने भारतावर आर्थिक घुसखोरी आणि आक्रमणही केले आहे. अशा वेळी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देऊन चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. आपले घर, परिसर सुरक्षित असेल तर देशही सुरक्षित राहू शकतो. देशाच्या सुरक्षेला घातक ई-मेल, एसएमएस येत असल्यास सायबर पोलिसांना तत्काळ माहिती देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कान आणि डोळे उघडे ठेवून वावरणे गरजेचे आहे.’युद्धाचा अपारंपरिक मार्गकाश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले. ‘लढाईला कोणतेही नियम नसतात. काश्मीरमध्ये जे युद्ध लढले जात आहे ते अत्यंत अपारंपरिक आहे. भारतीय सैन्याला अपारंपरिक मार्गच चोखाळावा लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी हेच केले होते. आपली ताकद शत्रूपेक्षा कमी असते तेव्हा शत्रूला बेसावध पकडून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय. आजचे विचारवंत तेव्हा असते, तर शाहिस्तेखानावर वार करण्याबद्दल त्यांनी छत्रपतींनाही प्रश्न विचारले असते, असे ते म्हणाले. जे राजकीय पक्ष सैनिकांच्या विरोधात बोलतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे लोकांनी सांगायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शिवरायांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा ठसा जनतेवर उमटला आहे. हे श्रद्धास्थान जगाला परिचित होणे आवश्यक आहे. शिवरायांची वीरता, शौर्य, आस्था काही अंशी आपल्यामध्ये रुजली तरच आपण स्वत:ला त्यांचे पाईक म्हणवून घेऊ.- मुक्ता टिळक, महापौर देशाला सशक्त करण्यात महाराष्ट्राची, मराठी माणसाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. समाजात तरुणांना विधायक कामांसाठी प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे. सशक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विज्ञाननिष्ठ आणि समृद्ध भारत हे आपले स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांचा मूलमंत्र उपयुक्त ठरणार आहे.- पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञ