शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार

By admin | Updated: April 2, 2016 01:23 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास होऊ नये, यासाठी आंदोलने आणि मोर्चादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे

मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास होऊ नये, यासाठी आंदोलने आणि मोर्चादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.राहुल मोटे आणि बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असूनही त्याची अवस्था आधीच दयनीय झाली असताना आपल्या मागण्यांसाठी त्याने आंदोलन केले तर तो गुन्हा ठरू नये, अशी मागणी कडू आणि मोटे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा बरोबर असून, त्यांच्यावर दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)मी ओव्हरटाइम गृहमंत्री!राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे माझे पूर्ण लक्ष आहे. मी फूलटाइम नव्हे; तर ओव्हरटाइम गृहमंत्री आहे, असे फडणवीस म्हणाले.पोलिसांना निवृत्तीनंतर स्वत:चे घर नसते. हे लक्षात घेऊन पुढील तीन वर्षांत सर्व पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या १२ हजार घरे पोलिसांसाठी बांधून तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.