शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

कर्जमाफी दिली तरच शेतकरी आत्महत्या थांबतील

By admin | Updated: May 9, 2016 03:34 IST

दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे

लातूर : दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी केली. सद्यस्थितीत दर दिवसाला सरासरी ९ शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत़ संपूर्ण कर्जमाफी दिली तरच या आत्महत्या थांबतील, असा दावा त्यांनी केला़औसा येथे दुष्काळ परिषद झाल्यानंतर लातुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, कर्जमाफी देण्याऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन बोलत आहे़ मात्र यामुळे आत्महत्या थांबणार नाहीत़ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर १६ हजार गावे शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली़ दीर्घकालिन उपाययोजना ठीक आहेत़ पाणीपुरवठ्याच्या टँकरवर प्रशासनाचे कंट्रोल नाही़ दुष्काळाचा दुरुपयोग पैसा कमविण्यात केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे दुष्काळी पॅकेजची मागणी करीत आहेत़ पण हे पॅकेज मिळायचे कधी आणि जनतेला दिलासा कधी देणार असा प्रश्न आहे़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)