शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

1 जूनपासून शेतकरी जाणार संपावर

By admin | Updated: May 22, 2017 17:14 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनभावना तीव्र असतानाही शासनाने घेतलेली चालढकल करण्याची भूमिका, कर्जमाफीचा प्रश्न, शेतमालाला

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 22 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनभावना तीव्र असतानाही शासनाने घेतलेली चालढकल करण्याची भूमिका, कर्जमाफीचा प्रश्न, शेतमालाला  मिळत नसलेला हमीभाव यामुळे संतप्त सलेल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार येत्या 1 जूनपासून  शेतकरी संपावर जाणार आहेत.
 
 आज अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. संपावर गेल्यानंतर शेतकरी आपल्याकडील कोणत्याही शेतमालाची विक्री करणार नाहीत, असे यावेळी ठरवण्यात आले. तसेच शहरांकडे जाणारा दूध आणि भाजीपाला रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, कर्जमुक्तीसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच, असा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी  रविवारी केला होता.  शेतकरी संपाबाबत घनवट यांनी काल नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी  ते म्हणाले, संप यशस्वी करण्यासाठी रस्ते अडवणार, भाजीपाला बाजारपेठेत जाऊ देणार नाही, दूधाचे टँकर अडवणार आहे़ सरकार कर्जमुक्तीच्या किंवा शेतकरी उन्नतीच्या ठोस उपाययोजना सांगत नाही. शेती उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. पण सध्या वाढलेल्या उत्पदनालाच चांगला मिळत नाही़ त्यामुळे सध्याच्या शेतमालाला चांगला मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.
 
(  १ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच
 
दहा वर्षे कर्जाची वसुली करू नका, दहा वर्षानंतर शेतकरी मुद्दलची परतफेड करील़ आयात-निर्यातवरील बंधने उठवावीत, मार्केट उपल्बध करुन द्यावे, तंत्रज्ञान आणि व्यापाराचे स्वातंत्र द्यावे, शेतमाल नासू नये, यासाठी सुविधा द्याव्यात, शेतमाल प्रक्रिया उद्योगावरील बंधने हटवावीत, आदी मागण्या घनवट यांनी केल्या होत्या.