शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शेतकरी रडणार नाही..साल्यांची सालपटं काढणार, उद्धव ठाकरेंचा दानवेंना टोला

By admin | Updated: May 19, 2017 16:13 IST

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती. आता शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटं काढणार असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंना लगावला आहे. शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही. कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असं जाहीर आवाहनच करुन टाकलं. 
 
सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी आहे. मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही. मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय. शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
 
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग नको. मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही. समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवून नको असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 
 
तूरीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी तूर घोटाळा झाल्याचा आरोपही केला. सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असताना तूर आयात केली असा आरोप त्यांनी केला. 
 
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत विदेशातून काळा पैसा आणून देणार होते त्याचे काय झाले ? ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. शेतक-याला कर्जमुक्त करु नका, पण त्याच्या खात्यात स्विस बँकेतील 15 लाख आधी टाका अशी मागणी केली.