शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

शेतकरी अस्थिकलश आणणाऱ्यास अटक

By admin | Updated: May 22, 2017 00:41 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. शेतकरी मंत्र्यांना भेटूच शकणार नाहीत, असे धोरण तरी ठरवा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाला हाणला. या अटक प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली. कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थींचा कलश घेऊन वाळवा तालुक्यातील विजय जाधव हे कर्जमाफीसाठी मोटारसायकलवरून महाराष्ट्रभरात फिरत आहेत. शेतकरी वाचवा, कर्जमाफी करा, या मागणीसाठी त्यांनी अनके लोकप्रतिनिधींची भेट घेतली पण त्यांना कोणी दाद दिली नाही. शनिवारी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मंत्रालयासमोरील आकाशवाणी येथील आमदार निवासात ते थांबले होते. मात्र रात्री २.३०च्या सुमारास त्यांना नरिमन पॉइंट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आले. यासंदर्भात शिवसेनेचे मुंबईतील आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत आवाज उठविला.जाधव यांच्यावरील पोलीस कारवाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला. ‘या प्रकरणी चौकशी करून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन केले जाईल, असे सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री भेटलेशिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आ.अजय चौधरी, राजन साळवी आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करणारे जाधव यांची भेट घेऊन विचारपूस केली. दुपारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा आदी मागण्या जाधव यांनी केल्या.