शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकरी अस्थिकलश आणणाऱ्यास अटक

By admin | Updated: May 22, 2017 00:41 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. शेतकरी मंत्र्यांना भेटूच शकणार नाहीत, असे धोरण तरी ठरवा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाला हाणला. या अटक प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली. कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थींचा कलश घेऊन वाळवा तालुक्यातील विजय जाधव हे कर्जमाफीसाठी मोटारसायकलवरून महाराष्ट्रभरात फिरत आहेत. शेतकरी वाचवा, कर्जमाफी करा, या मागणीसाठी त्यांनी अनके लोकप्रतिनिधींची भेट घेतली पण त्यांना कोणी दाद दिली नाही. शनिवारी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मंत्रालयासमोरील आकाशवाणी येथील आमदार निवासात ते थांबले होते. मात्र रात्री २.३०च्या सुमारास त्यांना नरिमन पॉइंट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आले. यासंदर्भात शिवसेनेचे मुंबईतील आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत आवाज उठविला.जाधव यांच्यावरील पोलीस कारवाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला. ‘या प्रकरणी चौकशी करून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन केले जाईल, असे सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री भेटलेशिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आ.अजय चौधरी, राजन साळवी आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करणारे जाधव यांची भेट घेऊन विचारपूस केली. दुपारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा आदी मागण्या जाधव यांनी केल्या.