शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

रायगडमध्ये किसान वॉटर बँक

By admin | Updated: May 6, 2015 00:59 IST

रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून निर्माण होणारे पाणी फक्त ५० पैसे प्रति लिटर दराने देण्यात येणार असल्याचे किसान वॉटर बँकेचे मदन हरप्रित सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.व्यावसायिक दृष्टिकोन समोर न ठेवता केवळ सामाजिक दायित्व म्हणून हा प्रकल्प जनतेसाठी सुरु करीत आहे. यासाठी जिल्ह्यात जागेची पाहणी सुरु केली असल्याचे सिंग यांनी सांगितले. कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे बोलले जाते.हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार आहे. पाणी शुध्द करणाऱ्या यंत्रांची किंमत ही सुमारे २० लाख रुपये आहे. सध्या हे यंत्र दुबईसह राजस्थान, ओडिसा आणि दक्षिण भारतामध्ये कार्यरत असून त्याचा रिझल्ट सकारात्मक असल्याचे सिंग म्हणाले. स्वत:च्या विकासासाठी सर्व ग्रामीण भागातून शहराकडे धावतात, आम्ही मात्र खेड्यांच्या विकासासाठी ग्रामीण भागात काम करु इच्छितो, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.प्रकल्प सुरु करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सध्या श्रीवर्धनमधील जागेची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्राचे खारे पाणी गोड म्हणजेच पिण्यायोग्य होत असल्याने हा प्रकल्प सुरु झाल्यास पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.