शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

शेततळ्यांचे गाव !

By admin | Updated: June 12, 2016 01:57 IST

गावाला कायमस्वरूपी टॅँकरमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील नगाव येथील बापू कोळी यांनी गावात तब्बल ५० शेततळी निर्माण केली. एकाच गावात एवढी शेततळी

- संजय पाटील, अमळनेर

गावाला कायमस्वरूपी टॅँकरमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील नगाव येथील बापू कोळी यांनी गावात तब्बल ५० शेततळी निर्माण केली. एकाच गावात एवढी शेततळी करण्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण असावे. पावसाळ््यात शेततळ््यांमुळे १२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.पाणीटंचाईमुळे नगावला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. जलयुक्त शिवार योजनेत गावाची निवड झालेली नाही. बापू कोळींनी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांची परवानगी घेऊन गावठाण जागेत स्वखर्चाने ८८ बाय ७८ मीटरचे मोठे शेततळे तयार केले. शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा फायदा घेत, किरण गोसावी, दिनेश पाटील यांना सोबत घेऊन कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांच्या पथकाचे सहकार्य घेत, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. अनुदानातून संपूर्ण काम करणे शक्य नसल्याने, त्यांनी पोकलँडसाठी डिझेलचा स्वत: खर्च करून ५० शेततळी अवघ्या काही दिवसांत पूर्ण केली. गावशिवारातून वाहणाऱ्या खडकी नाल्यातून वाहून जाणारे पाणी एका पाइपलाइनद्वारे मोठ्या शेततळ्यात वळविण्यात आले, तर नैसर्गिक प्रवाहाला जोडून सलग आठ शेततळी तयार केली आहेत. त्यामुळे शेतशिवारातून वाहून जाणाऱ्या पाण्याने एकापाठोपाठ एक आठही शेततळी भरतील. तेवढ्या पाण्यात १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असा अंदाज आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळही दोन शेततळी केली आहेत. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी सुमारे १० लाख रुपये खर्च करून, चिखली नदीचे ८०० मीटर लांब व चार ते पाचमीटर खोलीकरण केले. गावविहिरीतील बंधाऱ्यात पाणी साचल्याने, १२ महिने पाणी राहणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून गाव टॅँकरमुक्त होईल.जुलै महिन्यात सुमारे १० हजार शेवग्याची झाडे शेततळ््यांच्या बांधावर लावण्यात येणार आहेत. परिणामी, झाडांची मुळे बांधाची माती धरून ठेवतील व शेततळ््यांचे आयुष्य वाढेल, तर शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल.गावातील पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न सुटण्याच्या हेतूने शेततळ््यांची निर्मिती केली आहे. माझ्यापासून सुरुवात करून, होणाऱ्या फायद्यांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शेतकरी तयार झाल्याने, शेततळ््याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले. - बापू कोळी, नगाव, ता. अमळनेर