शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे गाव !

By admin | Updated: June 12, 2016 01:57 IST

गावाला कायमस्वरूपी टॅँकरमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील नगाव येथील बापू कोळी यांनी गावात तब्बल ५० शेततळी निर्माण केली. एकाच गावात एवढी शेततळी

- संजय पाटील, अमळनेर

गावाला कायमस्वरूपी टॅँकरमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील नगाव येथील बापू कोळी यांनी गावात तब्बल ५० शेततळी निर्माण केली. एकाच गावात एवढी शेततळी करण्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण असावे. पावसाळ््यात शेततळ््यांमुळे १२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.पाणीटंचाईमुळे नगावला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. जलयुक्त शिवार योजनेत गावाची निवड झालेली नाही. बापू कोळींनी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांची परवानगी घेऊन गावठाण जागेत स्वखर्चाने ८८ बाय ७८ मीटरचे मोठे शेततळे तयार केले. शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा फायदा घेत, किरण गोसावी, दिनेश पाटील यांना सोबत घेऊन कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांच्या पथकाचे सहकार्य घेत, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. अनुदानातून संपूर्ण काम करणे शक्य नसल्याने, त्यांनी पोकलँडसाठी डिझेलचा स्वत: खर्च करून ५० शेततळी अवघ्या काही दिवसांत पूर्ण केली. गावशिवारातून वाहणाऱ्या खडकी नाल्यातून वाहून जाणारे पाणी एका पाइपलाइनद्वारे मोठ्या शेततळ्यात वळविण्यात आले, तर नैसर्गिक प्रवाहाला जोडून सलग आठ शेततळी तयार केली आहेत. त्यामुळे शेतशिवारातून वाहून जाणाऱ्या पाण्याने एकापाठोपाठ एक आठही शेततळी भरतील. तेवढ्या पाण्यात १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असा अंदाज आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळही दोन शेततळी केली आहेत. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी सुमारे १० लाख रुपये खर्च करून, चिखली नदीचे ८०० मीटर लांब व चार ते पाचमीटर खोलीकरण केले. गावविहिरीतील बंधाऱ्यात पाणी साचल्याने, १२ महिने पाणी राहणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून गाव टॅँकरमुक्त होईल.जुलै महिन्यात सुमारे १० हजार शेवग्याची झाडे शेततळ््यांच्या बांधावर लावण्यात येणार आहेत. परिणामी, झाडांची मुळे बांधाची माती धरून ठेवतील व शेततळ््यांचे आयुष्य वाढेल, तर शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल.गावातील पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न सुटण्याच्या हेतूने शेततळ््यांची निर्मिती केली आहे. माझ्यापासून सुरुवात करून, होणाऱ्या फायद्यांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शेतकरी तयार झाल्याने, शेततळ््याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले. - बापू कोळी, नगाव, ता. अमळनेर