शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कायम

By admin | Updated: July 20, 2015 01:04 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून

धामणगाव रेल्वे : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून एकाने विहिरीत उडी मारून तर, दुसऱ्याने विषप्राशन करून आणि तिसऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारुन आपले जीवन संपविले.धामणगावरेल्वे तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे कपाशी व तुरीला मोड आल्याने गजानन ज्ञानेश्वर शेलोटे (३५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शनिवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे सततच्या नापिकीमुळे अजय प्रकाश खरीपकार (२५) याने विषप्राशन करून आत्महत्या केली. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक जगवावे कसे, तसेच दुबार पेरणी कशी करावी याची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे गुरुवारी घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि नापिकीला कंटाळून वर्ध्यात हेमंत होमदेवराव घोडखांदे (३७) या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शेतात जात असल्याचे सांगून तो घरून निघून गेला मध्यरात्र होऊनही तो परतला नाही. शनिवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीखाली त्याचा मृतदेहच आढळून आला.