शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कायम

By admin | Updated: July 20, 2015 01:04 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून

धामणगाव रेल्वे : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून एकाने विहिरीत उडी मारून तर, दुसऱ्याने विषप्राशन करून आणि तिसऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारुन आपले जीवन संपविले.धामणगावरेल्वे तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे कपाशी व तुरीला मोड आल्याने गजानन ज्ञानेश्वर शेलोटे (३५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शनिवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे सततच्या नापिकीमुळे अजय प्रकाश खरीपकार (२५) याने विषप्राशन करून आत्महत्या केली. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक जगवावे कसे, तसेच दुबार पेरणी कशी करावी याची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे गुरुवारी घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि नापिकीला कंटाळून वर्ध्यात हेमंत होमदेवराव घोडखांदे (३७) या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शेतात जात असल्याचे सांगून तो घरून निघून गेला मध्यरात्र होऊनही तो परतला नाही. शनिवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीखाली त्याचा मृतदेहच आढळून आला.