शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शेतकरी, बेरोजगार निवडणुकीच्या अजेंड्यावरून गायब

By admin | Updated: September 26, 2014 01:14 IST

शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या भरोशावर आयुष्यभर राजकारण करणाऱ्यांना ऐन निवडणुकीच्या काळात या घटकांचा सोयीस्कर विसर पडतो. सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत

युती-आघाडीच्या बेकीची चर्चा : विधानसभेच्या रणधुमाळीत सर्वसामान्यांचा विसरसुरेंद्र राऊत - यवतमाळशेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या भरोशावर आयुष्यभर राजकारण करणाऱ्यांना ऐन निवडणुकीच्या काळात या घटकांचा सोयीस्कर विसर पडतो. सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत चर्चेत येणारे मुद्दे वेगळेच असून मूलभूत समस्यांना मात्र कुणीही हात घालत असल्याचे दिसत नाही. राजकीय पक्षांकडून प्रत्येक वेळेस आपण समाजकारण करत असल्याची ग्वाही दिली जाते. समाजसेवेचा आवही आणला जातो. त्यासाठी अनेकदा रुग्णसेवा, गोरगरिबांची सेवा, विद्यार्थ्यांच्या समस्या यासाठी पक्षस्तरावरून कार्यक्रमही हाती घेतले जातात. मात्र या सर्व घडामोडी निवडणुका तोंडावर आल्यानंतरच सुरू होतात. ही बाब नित्याची असल्याने मतदारांच्या अंगवळणी पडली आहे. आलिशान गाड्यातून फिरणारी नेतेमंडळी रस्त्यावर दिसायला लागतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांची आस्थेने विचारपूस करतात. अनोळखी व्यक्तीलाही वाकून नमस्कर केला जाते. या सर्व हालचाली पाहिल्या की निवडणूक जवळ आली हे निश्चित मानले जाते. दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असूनही असे कुठलेच चित्र यावर्षी पहावयास मिळत नाही. स्थानिक पातळीवरच्या समस्या घेवून घसा कोरडा करणारी नेतेमंडळी आता पक्षाची आघाडी - युती होते की नाही यातच मशगुल आहे. यावर्षी निसर्गाने सर्वांनाच बेजार केले आहे. समस्यांचा खच पडला असून मतदारांना भावनिक साध घालण्यासाठी चांगली संधी चालून आली होती. मात्र सत्तेतील आणि विरोधातील नेत्यांनी दुर्लक्षच केले आहे. ऐरवी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे नेते आता मूग गिळून गप्प आहेत. केवळ आपली उमेदवारी आणि पक्षाचे चिन्ह कसे मिळेल, यासाठीच त्यांचा धडपडा सुरू आहे. निसर्गातील असमतोलाने शेतकऱ्यांना पूर्णत: उद्ध्वस्त केले आहे. गारपिट त्यानंतर यावर्षी पावसाने मारलेली दडी यामुळे खरिपाची लागवड करताना दुबार व तिबार पेरणी करावी लागत आहे. आता कसेबसे पीक बहरत असताना युरियाच्या कृत्रिम तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबामध्ये साथीच्या तापाचे रुग्ण आहे. विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सुविधाच मिळताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही. अनेक गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विजेच्या भारनियमनाचा प्रश्न निवडणुकीतच विस्मृतीत पडला की काय असे चित्र पहावयास मिळत आहे. राजकारणात स्वार्थीपणा प्रत्येकच वेळी जोपासला जातो. या निवडणुकीत मात्र हा स्वार्थ सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून उघडउघडपणे पाळला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकाच सुरात सूर घालून आपसातच जागेच्या वाटाघाटीवरून भांडत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना पक्षाची समस्यांबाबत काय भूमिका राहणार कोणते विकासात्मक धोरण राबविणार याचा ऊहापोह कुठल्याच उमेदवार अथवा पक्षांकडून होताना दिसत नाही. लोकशाहीत अशा पक्ष आणि उमेदवारांची आपण निवड करायची काय, असा प्रश्न सुज्ञ मतदारांना पडला आहे.