शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी!

By admin | Updated: April 25, 2017 02:50 IST

सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही

मुंबई : सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही, तर त्यांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. राज्यातील खरेदी केंद्रांवर सुमारे १५ लाख तर शेतकऱ्यांकडे तब्बल सात लाख क्विंटल तूर खरेदीविना शिल्लक असताना, केंद्र सरकार मात्र खरेदीस मुदतवाढ न देण्यावर ठाम आहे. २२ एप्रिलपासून सरकारने तूरखरेदी बंद केली आहे. खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून असताना, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाफेडची केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. शनिवारपर्यंत सरकारने ५०५० रु. दराने तूरखरेदी केली. मात्र, सोमवारी खुल्या बाजारात तुरीचा भाव ३००० रु.पर्यंत खाली आला. त्यामुळे तातडीने खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तुरीची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांची दिल्लीत भेट घेतली. २२ एप्रिलपर्यंत केंद्रांवर आलेल्या मालाची खरेदी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय, आयात तुरीवरील शुल्क १० टक्क्यांवरु न २५ टक्के करावे आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. आतापर्यंत हमीभावाने ३९ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून तब्बल सुमारे ८ लाख क्विंटल माल खरेदी केंद्रांवर शिल्लक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शेतकऱ्यांचा विश्वासघात - विखेशेवटच्या दाण्यापर्यंत तूरखरेदी करण्याचे आश्वासन देऊनही शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदीस नकार देणे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारची खरेदीची क्षमता संपली आहे. अधिक तूरखरेदी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री सांगत आहेत. म्हणजेच यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्याससुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. - राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा