शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी!

By admin | Updated: April 25, 2017 02:50 IST

सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही

मुंबई : सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही, तर त्यांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. राज्यातील खरेदी केंद्रांवर सुमारे १५ लाख तर शेतकऱ्यांकडे तब्बल सात लाख क्विंटल तूर खरेदीविना शिल्लक असताना, केंद्र सरकार मात्र खरेदीस मुदतवाढ न देण्यावर ठाम आहे. २२ एप्रिलपासून सरकारने तूरखरेदी बंद केली आहे. खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून असताना, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाफेडची केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. शनिवारपर्यंत सरकारने ५०५० रु. दराने तूरखरेदी केली. मात्र, सोमवारी खुल्या बाजारात तुरीचा भाव ३००० रु.पर्यंत खाली आला. त्यामुळे तातडीने खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तुरीची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांची दिल्लीत भेट घेतली. २२ एप्रिलपर्यंत केंद्रांवर आलेल्या मालाची खरेदी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय, आयात तुरीवरील शुल्क १० टक्क्यांवरु न २५ टक्के करावे आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. आतापर्यंत हमीभावाने ३९ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून तब्बल सुमारे ८ लाख क्विंटल माल खरेदी केंद्रांवर शिल्लक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शेतकऱ्यांचा विश्वासघात - विखेशेवटच्या दाण्यापर्यंत तूरखरेदी करण्याचे आश्वासन देऊनही शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदीस नकार देणे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारची खरेदीची क्षमता संपली आहे. अधिक तूरखरेदी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री सांगत आहेत. म्हणजेच यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्याससुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. - राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा