शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: June 7, 2017 04:40 IST

कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भ तीन आणि मराठवड्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/ वर्धा/ उस्मानाबाद : संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भ तीन आणि मराठवड्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील परतापूर येथे संजय रामराव घनवट (४६) या शेतकऱ्याने सोमवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यातच उपवर मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. या ताणातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे.वर्धा जिल्ह्याच्या आकोलीमध्ये ईश्वर बळीराम इंगळे (५६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ईश्वर यांनी शेतीसाठी बँकेतून जवळपास ३ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यातच खरीपाच्या तोंडावर त्यांच्याकडील एक बैल दगावला. परिणामी, मशागतीची कामे कशी करावी असा प्रश्न त्यांना भेडसावत होता.अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा येथील गणेश काळबेंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील गुरुनाथ गुंडू ढोणे (२९) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री कर्जास कंटाळून गळफास घेतला. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील हिवरवाडीतील सूर्यभान बाबूराव गुंजाळ (५५) या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विंवचनेतून विषप्राशन केले. येवला तालुक्यातील पिंपरी येथील नवनाथ चांगदेव भालेराव (३०) या तरु ण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.