शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 20:49 IST

विष प्राशन : पाण्याअभावी १२ एकरातील फळझाडे तोडली

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी गजानन सुखदेव सुकळकर (६०) यांनी स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पाण्याअभावी आठ एकर शेतातील केळी व चार एकरांतील डाळिंबाची झाडे तोडावी लागली. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भंडारज, कारला भागात केळी, संत्र्याचे पीक घेतले जाते. काही प्रयोगशील शेतकºयांनी डाळिंबाचीसुद्धा लागवड आपल्या शेतात केली. तथापि, मागील पाच-सहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाणीपातळी खोल गेल्याने या पिकांना जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. गजानन सुकळकर यांच्याकडे २४ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत केळी व चार एकरांत डाळिंब हे फळपीक होते. पाणीपातळी खोल गेल्याने तिन्ही बोअरवेलचे पाणी आटले. त्यामुळे केळी व डाळिंबाची झाडे तोडण्याशिवाय सुकळकर यांच्यापुढे पर्याय नव्हता. या पिकासाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी २० जूनला सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुकळकर यांच्यावर सेंट्रल बँकेचे १० ते १२ लाख व खासगी सावकारांचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. सावकारी कर्जासंबंधी प्रकरण सहायक निबंधकांकडे प्रविष्ट असल्याचे समजते.