शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 02:18 IST

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली

बारामती : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली जीवनयात्रा संपवली. महिन्याभरात बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राजकीय पंढरी हादरून गेली आहे. काशिनाथ सिधू हिवरकर यांच्याकडे सोसायटी, बँक आणि खासगी सावकार तसेच संबंधातील लोकांचे हातउसने घेतलेले पैसे याचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व लोकांनी तगादा लावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेतीतून कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची मदत मिळाली नाही. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने कर्ज कोणत्या आधारे फेडायचे, अशा प्रकारचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच काशिनाथ सिधू हिवरकर यांची सून मागील ६-७ वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या खर्चाने ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे रात्री जेवण करताना आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी रात्री तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता भेट दिली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. हिवरकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. १५ वर्षे दुष्काळ तसाच... बारामती तालुक्यातील अर्धा भाग सतत दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्धा भाग नीरा डावा कालव्यामुळे सिंचनाखाली आला आहे. जिरायती भागाला उपसासिंचन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनमानी पद्धतीने आवर्तने दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील १५ वर्षांत येथील दुष्काळ हटला नाही. भाजपाच्या काळातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीसारख्या राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात महिनाभरातच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण बारामती, इंदापूरात आले आहे.राज्य सरकाराला अहवाल पाठवणार : तहसीलदारबारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेतली. मयत शेतकरी काशीनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती घेतली. या बाबतचा अहवाल राज्यसरकाला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कर्जाचा तपशीलदेखील घेतला जाणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.