शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 02:18 IST

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली

बारामती : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली जीवनयात्रा संपवली. महिन्याभरात बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राजकीय पंढरी हादरून गेली आहे. काशिनाथ सिधू हिवरकर यांच्याकडे सोसायटी, बँक आणि खासगी सावकार तसेच संबंधातील लोकांचे हातउसने घेतलेले पैसे याचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व लोकांनी तगादा लावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेतीतून कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची मदत मिळाली नाही. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने कर्ज कोणत्या आधारे फेडायचे, अशा प्रकारचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच काशिनाथ सिधू हिवरकर यांची सून मागील ६-७ वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या खर्चाने ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे रात्री जेवण करताना आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी रात्री तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता भेट दिली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. हिवरकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. १५ वर्षे दुष्काळ तसाच... बारामती तालुक्यातील अर्धा भाग सतत दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्धा भाग नीरा डावा कालव्यामुळे सिंचनाखाली आला आहे. जिरायती भागाला उपसासिंचन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनमानी पद्धतीने आवर्तने दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील १५ वर्षांत येथील दुष्काळ हटला नाही. भाजपाच्या काळातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीसारख्या राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात महिनाभरातच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण बारामती, इंदापूरात आले आहे.राज्य सरकाराला अहवाल पाठवणार : तहसीलदारबारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेतली. मयत शेतकरी काशीनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती घेतली. या बाबतचा अहवाल राज्यसरकाला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कर्जाचा तपशीलदेखील घेतला जाणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.