शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 02:18 IST

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली

बारामती : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली जीवनयात्रा संपवली. महिन्याभरात बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राजकीय पंढरी हादरून गेली आहे. काशिनाथ सिधू हिवरकर यांच्याकडे सोसायटी, बँक आणि खासगी सावकार तसेच संबंधातील लोकांचे हातउसने घेतलेले पैसे याचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व लोकांनी तगादा लावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेतीतून कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची मदत मिळाली नाही. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने कर्ज कोणत्या आधारे फेडायचे, अशा प्रकारचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच काशिनाथ सिधू हिवरकर यांची सून मागील ६-७ वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या खर्चाने ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे रात्री जेवण करताना आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी रात्री तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता भेट दिली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. हिवरकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. १५ वर्षे दुष्काळ तसाच... बारामती तालुक्यातील अर्धा भाग सतत दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्धा भाग नीरा डावा कालव्यामुळे सिंचनाखाली आला आहे. जिरायती भागाला उपसासिंचन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनमानी पद्धतीने आवर्तने दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील १५ वर्षांत येथील दुष्काळ हटला नाही. भाजपाच्या काळातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीसारख्या राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात महिनाभरातच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण बारामती, इंदापूरात आले आहे.राज्य सरकाराला अहवाल पाठवणार : तहसीलदारबारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेतली. मयत शेतकरी काशीनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती घेतली. या बाबतचा अहवाल राज्यसरकाला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कर्जाचा तपशीलदेखील घेतला जाणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.