शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राज्यातील शेतक-यांच्या सेंद्रीय शेतीकडे कल

By admin | Updated: June 17, 2015 01:40 IST

जैविक खतांचा वापर वाढला; ७.५१ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती.

नीलेश शहाकार/बुलडाणा : दुष्काळामुळे कमी होणारे उत्पादन, रासायनीक खतांमुळे होणारी शेतजमिनीची धूप, तसेच वाढणार्‍या किंमतीमुळे शेतकर्‍यांचा जैविक व सेंद्रीय खतांचा वापराकडे कल वाढला आहे. गत दोन वर्षात राज्यातील ४४,५५१ पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीची कास धरली आहे. यंदा राज्यात सुमारे ७.५१ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आहे. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते व जमिनीचीही धूप होवून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा नाश होतो. सुरुवातीला जरी रासायनिक खते वापरून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळू न देता अधिक उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय शेती महत्वपूर्ण ठरत आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी गटांसाठी स्वतंत्र योजना आखण्यात आलेल्या आहेत. यातून गत दोन वर्षात सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे १७,७0४ पेक्षा जास्त समूह तयार झाले आहेत. त्यात ४४,५५१ पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा समावेश असलेले १,६८३ सेंद्रीय शेतीचे गट प्रमाणित आहेत. राज्यात एकूण पिकक्षेत्रापैकी सुमारे ७.५१ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आले आहे. *जैविक व सेंद्रीय खताचा वापर वाढला जैविक खते म्हणजे सेंद्रीय खतेच, परंतु जैविक खातात रायझोबियम, झोटोबॅक्टर, निलहरित शेवाळे, अझोला, फॉस्फोबॅक्टरीयम, मायकोर्‍हायझा इत्यादी सूक्ष्म जीवांचा समावेश होतो.तर सेंद्रिय खते शेणखत, कचरा खत, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, नाल्यातील गाळ, उसाची मळी, कडूलिंबाचा पाला, शेतीतील शिल्लक कचर्‍यातून तयार होते. यामुळे जमीन-पाण्याचे प्रदुषण टाळता येवून मातीची सुपिकता कायम राहते. हे खत सहज तयार करता येते किंवा उपलब्ध होत असल्यामुळे शेतीमध्ये वापर वाढला आहे.

*मृद आरोग्य पत्रिका अभियान

     शेत जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या शेताची मातीची आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन दयावयाची आहे. यातून मृद आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडुळ खतासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणार्‍या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी सन २0१५-१६ या वर्षात राज्यातील २८0 गावातून १७ हजार १२७ नमुने काढण्यात येणार आहेत.

*जैविक खत वापराचा चढता आलेख

वर्ष             जैविक खत(मे.टन)

२0११-१२          २,२00

२0१२-१३         १,0४६

२0१३-१४         २,६५0

२0१४-१५        २,४३३

२0१५-१६          ३,८७५      (नियोजन)