शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जदार होऊच नये

By admin | Updated: July 17, 2017 20:36 IST

शेतकरी कर्जदारच होऊ नये, यासाठी शेतकरी संघटना आता अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला सादर करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.  17 : शेतकरी कर्जदारच होऊ नये, यासाठी शेतकरी संघटना आता अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला सादर करणार आहे. सरकारने हा प्रस्ताव न स्वीकारल्यास राज्यभर शेतकरी संघटना ३ सप्टेंबरला ग्रामपंचायतीपुढे कर्जमुक्ती दिवस पाळून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. आमदार निवासात शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या प्रस्तावात शेती क्षेत्राला आर्थिक स्वातंत्र मिळण्यासाठी सरकारने काय करावे, याची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात येणार आहे. सरकारने शेतमालाबाबत धोरण निश्चित करावे. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेला मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करावी. यासह शेतकरी स्वावलंबी कसा होईल, तो पुन्हा कर्जदार होणार नाही, यासंदर्भात संपूर्ण अभ्यास होणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनाचे अवलोकन करण्यात आले. सरकारने केलेल्या अपूर्ण कर्जमाफीवर अभ्यासात्मक विवेचन करण्यात आले. कर्जमाफीबद्दल सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. बँकेच्या गैरपद्धतीच्या व्यवहारामुळे कर्जमाफी बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आणि दिशाभूल करणारा सरकारचा निर्णय असल्याचा सूर बैठकीत निघाला. त्यामुळे शेतकरी संघटना आपला प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमुक्ती द्यावी व वीज बिल माफ करावे अशी मागणी सुद्धा करणार असल्याचे घनवट म्हणाले. पत्रपरिषदेला वामनराव चटप, गीता खांडेभराड, शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील, राम नवेले, सतीश दाणी, मदन कामडे, संतूपाटील झांबरे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

 
आणखी वाचा 
चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्तची शिक्षा कमी केली
"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मुंबई : वर्सोव्यात नामांकित शाळेतील महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

- शेतकरी संघटनेच्या सरकारकडे मागण्या कर्जमुक्ती व वीज बिलमुक्ती करावी.शेतजमिनीसंदर्भातील कायदे रद्द करावे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोकळी करावी.शेतमालाच्या प्रक्रियेवरील निर्बंध हटवावेत.केंद्र सरकारने पारित केलेल्या एल.ए.आर.आर.-२०१३ कायद्यातील तरतुदीचे पालन करावेरस्ते, वीज, साठवणूक आदी संरचना निर्माण करावी.आंदोलन लेखा-जोखा१ आॅगस्टपासून भाजपाच्या नेत्यांना सभाबंदी३ सप्टेंबर रोजी गावागावात संपूर्ण कर्जमुक्तीसाठी उपोषणकर्जमुक्ती व वीज बिलमुक्तीसाठी ग्रामपंचायत व ग्रामसभेत ठराव पारितराष्ट्रपतींना पाठविणार निवेदन