शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश

By admin | Updated: June 6, 2017 05:36 IST

पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणतांबा(अहमदनगर) : पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार राज्यात सर्वत्र संपाचे लोण पसरले. या पुणतांबा ठरावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी पुणतांबा येथे केले.पुणतांब्यात येऊन कॉ. नवले यांनी गावातून अनवाणी पायी चालून आत्मक्लेश व्यक्त केला. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून संप मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, पेन्शन योजना आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात, अशी चर्चा नाशिक येथील बैठकीत झाली आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. सर्वांनी एकत्रित येऊन संपाची व्याप्ती वाढवावी. पुणतांब्याच्या ग्रामसभेने ठराव केल्याने राज्यातील शेतकरी संघटित झाला आहे. त्यामुळे पुणतांबा ही या संपाची कर्मभूमी असून,येथील शेतकऱ्यांना सलाम केला आहे. समन्वय समिती स्थापणारनाशिक येथील बैठकीत संपाची रूपरेषा ठरवण्यात आली. यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. खा. राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, आ.बच्चू कडू यांच्यासह कृषी तज्ज्ञ, विचारवंत तसेच संघटनेतील सदस्य मिळून समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल, असे नवले म्हणाले.महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनातआहे.