शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश

By admin | Updated: June 6, 2017 05:36 IST

पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणतांबा(अहमदनगर) : पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार राज्यात सर्वत्र संपाचे लोण पसरले. या पुणतांबा ठरावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी पुणतांबा येथे केले.पुणतांब्यात येऊन कॉ. नवले यांनी गावातून अनवाणी पायी चालून आत्मक्लेश व्यक्त केला. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून संप मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, पेन्शन योजना आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात, अशी चर्चा नाशिक येथील बैठकीत झाली आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. सर्वांनी एकत्रित येऊन संपाची व्याप्ती वाढवावी. पुणतांब्याच्या ग्रामसभेने ठराव केल्याने राज्यातील शेतकरी संघटित झाला आहे. त्यामुळे पुणतांबा ही या संपाची कर्मभूमी असून,येथील शेतकऱ्यांना सलाम केला आहे. समन्वय समिती स्थापणारनाशिक येथील बैठकीत संपाची रूपरेषा ठरवण्यात आली. यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. खा. राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, आ.बच्चू कडू यांच्यासह कृषी तज्ज्ञ, विचारवंत तसेच संघटनेतील सदस्य मिळून समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल, असे नवले म्हणाले.महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनातआहे.