शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

शेतकऱ्यांची बियाणे बँक

By admin | Updated: May 1, 2017 05:14 IST

वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस

नीलेश धोपेश्वरकर / ठाणे/पालघर वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. पण, समाजात अशा काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांचे खासकरून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील संजय पाटील आणि बायफ संस्था. पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील ११ गावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एतापल्लीमधील १५, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमधील १२, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ६ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील १० अशा सुमारे ५४ गावांमध्ये बियाणांचे संशोधन, संवर्धनाचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पट्टा हा आदिवासी आहे. अशा संवर्धनातून बियाणांची बँक तयार झाली. यातून शेतीच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले. कमी किंवा दुर्मीळ होत चाललेली पिके किंवा बियाणे यांचे पुनरुज्जीवनही केले जाते.बायफसारखी संस्था पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने या उपक्रमाला यश मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्यामुळे कामाला गती आणि दिशा मिळाली. एकाच प्रकारची पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत कसा राखला जाईल, तग धरणारी कुठली पिके, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बियाणांची स्वायत्तता, सुरक्षिततेबरोबरच बँकेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे, हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चार भिंतींत संशोधन केले जाते. आम्ही थेट शेतात जाऊन ते करतो. तेही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत. बियाणे वापरण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते, असे पाटील यांनी सांगितले. संशोधन करून बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते रजिस्टर करण्यासाठी बायफ संस्था पुढाकार घेते. दोघांना राष्ट्रीय पुरस्कारजव्हार तालुक्यातील चौक गावातील मावंजी पवार या तरुणाने वडिलांबरोबर शेती करत असतानाच बायफच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याने भाताच्या वाणाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. संवर्धन, संशोधनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मावंजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, जव्हार तालुक्यातीलच सुनील कामोदी याने भाताचे अश्विनी नावाचे वाण बायफच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार केले. त्यालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.