शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शेतकऱ्यांची बियाणे बँक

By admin | Updated: May 1, 2017 05:14 IST

वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस

नीलेश धोपेश्वरकर / ठाणे/पालघर वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. पण, समाजात अशा काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांचे खासकरून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील संजय पाटील आणि बायफ संस्था. पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील ११ गावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एतापल्लीमधील १५, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमधील १२, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ६ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील १० अशा सुमारे ५४ गावांमध्ये बियाणांचे संशोधन, संवर्धनाचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पट्टा हा आदिवासी आहे. अशा संवर्धनातून बियाणांची बँक तयार झाली. यातून शेतीच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले. कमी किंवा दुर्मीळ होत चाललेली पिके किंवा बियाणे यांचे पुनरुज्जीवनही केले जाते.बायफसारखी संस्था पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने या उपक्रमाला यश मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्यामुळे कामाला गती आणि दिशा मिळाली. एकाच प्रकारची पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत कसा राखला जाईल, तग धरणारी कुठली पिके, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बियाणांची स्वायत्तता, सुरक्षिततेबरोबरच बँकेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे, हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चार भिंतींत संशोधन केले जाते. आम्ही थेट शेतात जाऊन ते करतो. तेही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत. बियाणे वापरण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते, असे पाटील यांनी सांगितले. संशोधन करून बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते रजिस्टर करण्यासाठी बायफ संस्था पुढाकार घेते. दोघांना राष्ट्रीय पुरस्कारजव्हार तालुक्यातील चौक गावातील मावंजी पवार या तरुणाने वडिलांबरोबर शेती करत असतानाच बायफच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याने भाताच्या वाणाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. संवर्धन, संशोधनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मावंजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, जव्हार तालुक्यातीलच सुनील कामोदी याने भाताचे अश्विनी नावाचे वाण बायफच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार केले. त्यालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.