शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बियाणे बँक

By admin | Updated: May 1, 2017 05:14 IST

वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस

नीलेश धोपेश्वरकर / ठाणे/पालघर वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. पण, समाजात अशा काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांचे खासकरून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील संजय पाटील आणि बायफ संस्था. पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील ११ गावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एतापल्लीमधील १५, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमधील १२, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ६ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील १० अशा सुमारे ५४ गावांमध्ये बियाणांचे संशोधन, संवर्धनाचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पट्टा हा आदिवासी आहे. अशा संवर्धनातून बियाणांची बँक तयार झाली. यातून शेतीच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले. कमी किंवा दुर्मीळ होत चाललेली पिके किंवा बियाणे यांचे पुनरुज्जीवनही केले जाते.बायफसारखी संस्था पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने या उपक्रमाला यश मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्यामुळे कामाला गती आणि दिशा मिळाली. एकाच प्रकारची पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत कसा राखला जाईल, तग धरणारी कुठली पिके, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बियाणांची स्वायत्तता, सुरक्षिततेबरोबरच बँकेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे, हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चार भिंतींत संशोधन केले जाते. आम्ही थेट शेतात जाऊन ते करतो. तेही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत. बियाणे वापरण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते, असे पाटील यांनी सांगितले. संशोधन करून बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते रजिस्टर करण्यासाठी बायफ संस्था पुढाकार घेते. दोघांना राष्ट्रीय पुरस्कारजव्हार तालुक्यातील चौक गावातील मावंजी पवार या तरुणाने वडिलांबरोबर शेती करत असतानाच बायफच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याने भाताच्या वाणाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. संवर्धन, संशोधनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मावंजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, जव्हार तालुक्यातीलच सुनील कामोदी याने भाताचे अश्विनी नावाचे वाण बायफच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार केले. त्यालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.