शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

By admin | Updated: January 25, 2015 00:54 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा विधानसभेत करून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. दरम्यान केंद्र सरकारच्या चमूनेसुद्धा दौरा करून

सात हजार कोटीचे पॅकेज : एकरी हजार रुपये नुकसानभरपाई कमल शर्मा/फहीम खान - नागपूरदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा विधानसभेत करून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. दरम्यान केंद्र सरकारच्या चमूनेसुद्धा दौरा करून मदतीचे आश्वासन जाहीर केले. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एक एकर जमिनीच्या मालकाला केवळ हजार रुपये नुकसान भरपाई मिळत आहे. ही केवळ एखाद दुसऱ्या शेतकऱ्याची घटना नसून विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांची व्यथा आहे. पहिल्या टप्प्यात ११० कोटीशेतकऱ्यांना प्रत्येकी ७०० ते १००० रुपये नुकसानभरपाई मिळत आहे. राज्य सरकारने ११ डिसेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सात हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. सोबतच दीर्घकालीन उपाययोजनाही सादर केल्या होत्या. सरकारने पॅकेजच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपये वितरित केले आहे. या निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. तलाठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम सांगितली जात आहे. नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. परंतु मिळणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम ऐकून शेतकरी आनंदी होण्याऐवजी दु:खी झाले आहेत. ज्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे ते शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच बरबाद झाले आहेत. एकट्या नागपूर विभागामध्येच दुष्काळग्रस्त गावांची संख्या ४८३२ एवढी आहे. यात नागपूर जिल्ह्यातील १७९५ गावांचा समावेश आहे. पॅकेजच्या पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपये नागपूर जिल्ह्यासाठी वितरित झाले आहेत. (प्रतिनिधी)